‘अत्यंत शांत, संयमी, प्रसन्न व सुस्वभावी असलेल्या संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांचे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचे योगदान आहे. शिक्षण महर्षी प. पू. डॉ. बापूजी साळुंखे यांनी उभी केलेली श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारी संस्था आहे. त्यांच्या पत्नी संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांनी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या शैक्षणिक कार्याला व संस्था उभारणीला आयुष्यभर साथसोबत केली. संस्थेतील शिक्षण घेणार्या मुलांची,
‘आपल्या समाज व्यवस्थेतील प्रत्येक शिक्षक शिक्षणाबरोबरच आपले सामाजिक उत्तरदायित्व कर्तव्य भावनेने पार पडत असतात. विद्यार्थ्यांच्या मनावर सुसंस्कार, आचार-विचार व संस्कृती या सर्व बाबींचे योग्य मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सर्व शिक्षक आपापल्यापरीने योग्य प्रकारे पार पाडत असतात.
जिल्ह्याभोवती कोरोनाचा विळखा घट्ट होऊ लागला असून, संसर्ग वेगाने पसरत आहे. शनिवारी दिवसभरात 827 बाधित आढळले तर 11 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
‘शिक्षक म्हणजे शुद्ध जीवन, शिक्षक म्हणजे संयमी व्यक्तिमत्त्व, हृदयापासून शिकवणारे शिक्षक झाले पाहिजेत. चांगल्या शिक्षकाने संयमी झाले पाहिजे आणि महात्मा गांधींचा आदर्श ठेवला पाहिजे. डॉ. राधाकृष्णन हे प्रगल्भ विचारांचे व्यक्तिमत्त्व होते.
आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, सौ. वेदांतिकाराजे भोसले व कुटुंबियांनी स्वमालकीच्या विसावा नाका येथील पुष्कर हॉल येथे स्वखर्चाने 80 बेडचे सुसज्ज असे कोव्हीड केअर सेंटर उभारले आहे. या सेंटरमध्ये 40 बेड हे ऑक्सिजन पुरवठ्यासह सुसज्ज असून उर्वरीत 40 बेड विना ऑक्सिजनयुक्त आहेत.
सध्या कोरोना आणि लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदवी पब्लिक स्कूलची ‘ऑनलाईन’ डिजिटल शाळा सुरू आहे. शिक्षकांनी हातात हात घालून दर्जेदार शिक्षणाची परंपरा अखंडित ठेवल्याने नवीन प्रवेशासाठी विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, जिल्ह्यात शुक्रवारी 875 जण बाधित झाले तर 19 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे सातारकरांची धास्ती वाढली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप सुरूच आहे. बाधितांनी 15 हजारांचा टप्पा ओलांडल्यापासून 600 ते 700 रुग्णांची भर दररोज पडू लागली आहे. गुरुवारीदेखील तब्बल 828 बाधित आढळून आले.
‘खेड ग्रामपंचायतीने वनवासवाडी प्रभागात ग्रामविकासाला गती देण्याच्या उद्देशाने बांधलेल्या प्रशासकीय विस्तारित कक्षाचा कृष्णानगर, वनवासवाडी, विकासनगर या भागातील सुमारे दहा ते बारा हजार नागरिकांना लाभ होणार असून, या भागातील नागरिकांची अनेक वर्षांची मागणी ग्रामपंचायतीने पूर्ण केली आहे,’ असे प्रतिपादन मिलिंद पाटील यांनी केले.
‘कोरोनामुक्ती’मध्ये आपल्याला चांगले यश मिळत आहे. सातारा जिल्ह्याने आठ हजार पेक्षा जास्त रुग्णांना बरे केले आहे. देशात हा विचार केला तर 28 लाखांचा टप्पा आपण गाठला आहे.आपल्या महाराष्ट्रात तब्बल सहा लाख रुग्ण बरे झाले आहेत. संपूर्ण चित्र दिलासादायक आहे. आता गाफीलपणा बाळगू नये, सर्व प्रकारची काळजी घ्यावी,’ असे प्रतिपादन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी एका पत्रकाद्वारे केले.