सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून जिल्ह्यात बुधवारी सर्वाधिक 713 जण बाधित झाले. तसेच 16 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे सातारकरांची धास्ती वाढली आहे. जिल्ह्यात आणखी 373 कोरोनामुक्त जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले 373 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक ड...
समाजाच्या जडणघडणीमध्ये शिक्षकांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात असे शिक्षक येतात की, ज्यांच्यामुळे आपल्या जीवनाला नवीन वळण मिळत असते. आयुष्याच्या अशा वळणावर ज्या शिक्षकांनी आपल्यावर विश्वास दाखवून आपल्या कठीण परिस्थितीत मदत केलेली असते. आपल्याला आवश्यक असेल अशा वेळी आपल्यातील आत्मविश्वास जागृत करून यश संपादनासाठी प्रोत्साहित केलेले असते. ज्या शिक्षकांनी आपल्या आयुष्यात परिवर्तन आणले अशा शिक्षकांचे आभार व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व
येथील छत्रपती शिवाजी संग्राहलयात 250 बेडचे कोविड रुग्णालय उभारण्यास शासनाने मान्यता दिली आहे. जिल्हा प्रशासनाकडून या कोविड रुग्णायालचे काम तातडीने चालू केले आहे. या कामाची पाहणी सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील व गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी केली.
सातारा जिल्हा आता कोरोनाचा हॉटस्पॉट बनू लागला आहे. जिल्ह्यात सोमवारी 661 जण बाधित झाले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या आता 14,658 झाली आहे. तर 15 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
दहा हजारांची लाच मागितल्याप्रकरणी कराड येथील वैधमापनशास्त्र कार्यालयातील निरीक्षक आणि क्षेत्र सहायक अशा दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
हॉकीचे सर्वकालीन महान खेळाडू मेजर ध्यानचंद या महान खेळाडूचा गौरव म्हणून 29 ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ म्हणून देशभर साजरा केला जातो. या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. शिवाय खेळातील सर्वोच्च जीवन गौरव पुरस्कार म्हणून 2002 पासून ध्यानचंद पुरस्कार देण्यात येतो. आपल्या कारकिर्दीत खेळात असामान्य कर्तृत्व दाखवणार्या आणि निवृत्तीनंतरही त्या खेळासाठी जीवन वेचणार्या क्रीडापटूला ‘ध्यानचंद जीवन गौरव’ पुरस्क
सातारा जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दररोज 500 ते 600 रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. रविवारीदेखील 489 कोरोनाबाधित आढळले आहेत तर 11 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 13,997 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
‘आजचे संशोधन हे यूजीसीचा फोर्स, बढती, नियुक्ती आदी कारणांसाठी केले जात असून, संशोधन परंपरेला अस्वस्थ करणारे, असे हे चित्र आहे. ऑनलाईन नियतकालिके, आयएसएसएन, आयएसबीएन अशी गोंडस नावे देऊन आज संशोधन पेपर, पत्रिका काढल्या जात आहेत. एपीआय स्कोअर जास्त होण्यासाठी केवळ संशोधन पेपर लिहिले जातात. खेळाडू जसे धावा काढून स्कोअर वाढवतात, तसे हे आहे. संशोधनातील नैतिकता यात हरवून गेली आहे. भाषा कोणती रूपे धारण करते आहे, याकडे संशोधकांचे लक्ष नाही.अशावेळी ज्यांनी कोणत्याही लाभाची अपेक्षा केली नाही, अशा संशोधन कर
जिल्हाधिकार्यांच्या निवासस्थानासमोर जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागली असून, या गळतीमधून हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. पाण्याच्या होणार्या या अपव्ययाबद्दल सातारकर जनतेतून जीवन प्राधिकरणाच्या या भोंगळ कारभाराविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
कोव्हीड सेंटरमध्ये बेड व व्हेंटिलेटरची आवश्यकता भासू लागली असतानाच रुग्णसंख्या वेगाने वाढू लागल्याने सातारा जिल्ह्यातील कोरोना आता उग्र स्वरूप धारण करू लागला आहे. शनिवारी पुन्हा 619 इतके बाधित सापडले असल्याने एकूण रुग्णसंख्या आता 13, 507 झाली आहे. दरम्यान, 14 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.