सातारा जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांचे वरिष्ठ व निवडश्रेणी प्रस्ताव गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत. शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी राज्य शासनाने सुरुवातीचे अनेक जाचक नियम व अटी रद्द करून त्यामध्ये अनेक बदल केलेले आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. तसेच बळींची संख्याही वाढली असून 25 जणांचा बळी गेला आहे. तसेच गुरुवारी दिवसभरात 800 जण बाधित झाले आहेत. सध्या बळींची संख्या 582 इतकी झाली आहे.
कोरोनाबाधितांची संख्या सातारा जिल्हावासीयांच्या काळजात धडकी भरवू लागली आहे. बुधवारीदेखील जिल्ह्यात 817 नवे कोरोनाबाधित आढळून आले तर 21 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
‘सध्याच्या शिक्षण पद्धतीत संस्थांची चलती आणि बाजारूपणा बोकाळला आहे. ज्ञानाच्या आधारावर नोकरी मिळवण्याची संकल्पना विद्यार्थ्यांच्या डोक्यातून पुसट होत आहे. नोकरी योग्य कौशल्य नसल्याने बेरोजगारी वाढत आहे. म्हणून नवीन शैक्षणिक धोरणात आता आंतरविद्याशाखीय पदवी घेण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे पुढील काळात रोजगार मिळण्यासाठी आंतरविद्याशाखीय पदवी आणि संशोधन काम हे उपयोगी ठरेल.
कोरोनाचा कहर वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी म्हणून सातारा जिल्ह्यातील मुद्रांक विक्रेते व दस्त लेखनिक यांनी कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
शिकारीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत २५ हजार उकळणाऱ्या वनविभागाच्या दोन कर्मचाऱ्यांसह अज्ञात दोघांवर खंडणीचा गुन्हा दाखल करणाऱ्या पिरेवाडीच्या युवकावरच आता वनविभाग गुन्हा दाखल करण्याचा तयारीत आहे. आठ दिवस उलटल्यानंतर वन विभागाला जाग कशी आली असा प्रश्न उपस्थित होत आहे
जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून, मंगळवारी जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येने 20 हजारांचा टप्पा ओलांडला. दिवसभरात 921 बाधित आढळले तर एकूण 23 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
सातारा शहराच्या हद्दवाढीच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वाक्षरी करुन मंजुरी दिली. हद्दवाढ झाल्याचे पत्र आज अजित पवार यांनी आमदार शिवेंद्रराजेंना सुपूर्द केले. या निर्णयामुळे सातारा नगरपालिका ही ’क’ वर्ग महानगरपालिकेच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे.
जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून दिवसभरात 25 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, सोमवारी दिवसभरात 621 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 19,609 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून, यामध्ये बाधितांच्या मृत्यूचेही प्रमाण जास्त आहे. सोमवारी (दि. 7) दिवसभरात जिल्ह्यात सर्वाधिक 25 बाधितांच्या मृत्यूची नोंद झाल्याने कोरोनाबाधितांच्या मृत्यूने पाचशेचा आकडा ओलांडला आहे.