जिह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून मंगळवारी दिवसभरात 708 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 34 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाधितांच्या एकूण मृत्यूची संख्या आता 940 झाली आहे.
जिल्ह्यात सोमवारी तब्बल 40 जणांचे प्राण कोरोनाने घेतले. या महामारीचा उद्रेक वाढतच असून, दिवसभरात 690 जण बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 31,514 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे असून, त्यापैकी 21,125 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 38 कोरोनाबाधितांचा उपचादररम्यान मृत्यू झाला तर 732 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या आता 30,824 इतकी झाली आहे तर आजपर्यंत 20,250 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढू लागला आहे. शनिवारी दिवसभरात 977 जण कोरोनाबाधित झाले तर 21 जणांचा उपचादरम्यान मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे 809 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 19,866 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, शुक्रवारी दिवसभरात 962 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला तर 24 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे बाधितांची एकूण रुग्णसंख्या आता 29,115 इतकी आहे. तर दि. 18 रोजी उच्चांकी 1280 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
जिल्ह्यात गुरुवारी 790 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला तर 31 जणांचा उपचादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत 28,152 कोरोनाबाधित झाले आहेत. त्यापैकी 17,777 जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.
जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 913 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर 27 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच दिवसभरात 583 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढू लागला असताना कोरोनावर मात करूनही अनेकजण घरी परतत आहेत. आतापर्यंत एकूण 17,107 जणांनी कोरोनावर विजय मिळवला आहे.
‘मागील अनेक वर्षांपासून बरीचशी शिक्षक पदे संचमान्यतेत नव्हती. अनेक शिक्षक संघटना, विषय संघटना यांच्या मागण्यांचा आघाडी सरकारने विचार करून संचमान्यतेत नसलेली शिक्षक पदे पुन्हा घेण्याबाबत संचमान्यतेच्या निकषात बदल करण्याचा निर्णय घेतला. संचमान्यतेच्या निकषात काही त्रुटी असतील तर त्या संदर्भात विचार करून सर्व समावेशक निर्णय लवकरच जाहीर करू. तसेच शारीरिक शिक्षण शिक्षक पदाबाबत संघटनेच्या मागणीचा शासन सकारात्मक विचार करेल,’ असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री वषार्र् गायकवाड यांनी दिले.
सातारा : आज संपूर्ण जग करोनाच्या विळख्यात सापडले आहे. सातारामध्येही कोरोना कहर वाढला आहे. अशाप्रसंगी कोरोनाग्रस्त पेशंटला हॉस्पिटलमध्ये जागा उपलब्ध होत नाही. सातारकरांची गरज ओळखून सातारकरांच्या सेवेकरिता हॉटेल रधिका पॅलेसमध्ये पाटील हॉस्पिटल प्रा. लि. कोरेगाव यांच्या सहकार्याने कोरोना केअर सेंटर सुरू केले आहे. ज्या पेशंट्सची ऑक्सिजन लेवल 94 पेक्षा जास्त आहे व वय दहा ते साठ ...
जिल्ह्यात बाधितांचे आकडे वाढण्याबरोबरच मृत्यूचे प्रमाणही वाढू लागले आहे. दररोज सुमारे 25 ते 35 रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे होत असल्यामुळे सातारा जिल्हावासीयांच्या काळजीत भर पडली आहे. मंगळवारीदेखील 35 रुग्णांचा उपचाराम्यान मृत्यू झाला तर 973 जण बाधित झाले.