बेलवडे बुद्रुक, ता. कराड येथील अंगणवाडी व लगत उभारण्यात आलेल्या संरक्षक भिंतीवर विविध संदेश व चित्रांचे रेखाटन करण्यात आले आहे. त्यामुळे ही भिंत बोलकी झाली असून गावाच्या सुशोभीकरणातही भर पडली आहे.
स्पर्धेवर यावर्षी परदेशी धावपट्टू नसल्याने स्थानिक धावपट्टूंचे वर्चस्व राहिले. या स्पर्धेत खुल्या माणच्या बाळू पुकळे या धावपटूने 1 तास 14 मिनिटे आणि 13 सेकंद इतक्या सर्वांत कमी विक्रमी वेळ नोंदवत पहिला क्रमांक मिळवला. अनिल कोरवी याने 1 तास 19 मिनिटे 8 सेकंद दुसरा तर धर्मेंदर कुमार याने 1 तास 21 मिनिटे 13 सेकंद तिसरा क्रमांक पटकावला. तर भारतीय महिला गटात मुंबर्इच्या मनिषा जोशी यांनी 1 तास 46 मिनिटे 35 सेकंद या वेळेत पहिला क्रमांक पटकावला.
करमाळा, जि. सोलापूर येथील मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांना मारहाण केली आहे. याचा बळीराजाच्या वतीने तीव्र निषेध नोंदवत कारखान्याच्या चेअरमनला अटक करा. अन्यथा, राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
दि. १२ डिसेंबर २०२१ रोजी सातारा शहरामध्ये दोन विशेष कार्यक्रम संपन्न झाले यामध्ये कोरोना नियमांची सर्रास पायमल्ली झालेली काल दिसून आली. सर्वसामन्य नागरिकांना लग्नासाठी ५० तर अंत्यविधीसाठी २० माणसांची मर्यादा टाकून प्रशाशनाने सातारा हिल मॅरेथॉन आणि जोर्तिमय यासाठी विशेष योजनेअंतर्गत कोरोना नियमनाची पायमल्ली करायची परवानगी दिलेप्रमाणे काल दोन्ही कार्यक्रमात वस्तुस्थिती दिसून येत होती, जणू काही प्रशासन दोन्ही आयोजकांचे खिशातच आहे अशी परिस्थिती निर्माण झाली होती. सर्वसामान्य आणि दुकानदार तसेच व्यापारी यांनी मास्क नाही घातला तर प्रशासन हजारो रुपयांचा दंड आकारते पण काल झालेल्या सातारा हिल मॅरेथॉन आणि जोर्तिमय या कार्यक्रमात कोविड नियमाची पायमल्लीसाठी आता प्रशासन किती दंड आकारणार व कोणती कारवाई करणार यावर सर्वसामान्य जनता, पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ते लक्ष ठेवून राहणारच आहेत.
मलकापूर नगरपालिकेच्या विठ्ठलदेव सोसायटी परिसरातील ओपन स्पेसमध्ये निसर्ग ग्रुप, कराड व मलकापूर नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमानाने देशी झाडांचे रोपण करण्यात आले. यामध्ये जांभूळ, अर्जुन, कडुलिंब, काटेसावर, ताम्हण, बकुळ, बुच, कैलासपती आदी. जातीच्या झाडांचा समावेश आहे.
शाळांची कार्यालये फोडून त्यातील रोख रक्कम लंपास करणाऱ्या मुंबईच्या चोरट्यास पोलिसांनी अटक करुन त्याच्याकडून कराडसह सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 28 चोऱ्या उघडकीस आल्या आहेत.
बुधवार पेठेतील नगरपालिकेने खोदलेल्या खड्डय़ातील पाण्यात बुडून विराट विजय चव्हाण या चिमुरड्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर येथील 'त्या' कामाला नगरपालिकेने स्थगिती दिली आहे.
वडोली-निळेश्वर, ता. कराड येथे शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष व सदस्य निवडीवरून झालेल्या वादावादीचे रूपांतर मारामारीत झाले. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्याची कार्यवाही सुरु असुन आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगीतले.
शहरातील बुधवार पेठेत एकाला शिवीगाळ, दमदाटी करत लाकडी दांडके व फरशी डोक्यात घालून दोघांनी मारहाण केली. शुक्रवार दि. 10 रोजी रात्री 9.45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये एकजण जखमी झाला आहे. याप्रकरणी कराड शहर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.
श्री. छ. शिवाजी महाराज पुतळा परिसराचे सुशोभीकरणाचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरु असताना दिसून येत आहे. त्याचे मागून राजधानी सातारा चा सेल्फी पॉईंचे पण काम सुरु होऊन पूर्ण होऊन त्याचे मोठ्या दिमाखात उदघाटन पण झाले. एवडी सगळी कामे जलद गतीने होत असताना अशा कोणत्या अडचणी आहेत कि त्या श्री. छ. शिवाजी महाराज पुतळा परिसराचे काम धीमे करत आहेत