बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आझाद मैदान (मुंबई) येथे गुरुवार 23 डिसेंबर रोजी शेतकऱ्यांची गारानी मांडण्यासाठी आंदोलन करण्यात आले. त्याठिकाणी दिवसभर थांबूनही सरकारने शेतकऱ्यांचे गाराने ऐकले नाही. त्यामुळे राज्यातील आघाडी सरकारच्या निषेधार्थ बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने १ जानेवारी २०२२ हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
खटाव, ता. खटाव गावच्या हद्दीत अवैध वाळु तस्करांवर धडक कारवाई करत त्यांच्याकडून ६ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. याप्रकरणी करण राजेंद्र पाचागणे, कैलास अंकुश गलांडे, ओमकार धनाजी पाटोळे, निलेश बाळु मदने, सर्व रा. खटाव, ता. खटाव यांना ताब्यात घेण्यात आले असून खटाव येथीलच गणेश उर्फ रजनीकांत शंकर शिंदे हा फरार होण्यात यशस्वी झाला आहे.
राजवाडा बसस्थानकांमध्ये दि. २० डिसेंबर रोजी प्रशासनाची परवानगी न घेता भिंती शिल्पाचे अनावरण केल्याप्रकरणी २१ जणांवर शाहुपुरी पोलीस ठाण्यात पुणे दाखल करण्यात आले असून या घटनेच्या अनुषंगाने २८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव यांनी दिली.
शहरातील दत्त चौक परिसरात एका युवकावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या भांडणाचा राग मनात शनिवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये संबंधित युवक जखमी झाला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
गोडोली, ता. सातारा येथून अज्ञात चोरट्याने ५ हजार रुपये किमतीच्या चंदनाच्या झाडाच्या खोडाची चोरी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
गोडोली, ता. सातारा येथील जकात नाक्यासमोर पूर्ववैमनस्यातून एकाला दोघांनी मारहाण केल्याची घटना घडली याबाबत संबंधित दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुचाकी अपघातांमध्ये हेल्मेट नसल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा, यासाठी कराड शहर वाहतूक शाखेच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोजिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गांधीगिरी पद्धतीने हेल्मेट जनजागृती मोहीम राबवण्यात आली.
कराड येथील विभागीय कार्यशाळेच्या कर्मचाऱ्याने चालक, वाहक नसलेल्या एस.टी. बस मधुन प्रवाशांची अनधिकृतपणे वाहतुक केल्याचा प्रताप आज सकाळी सातारा येथील पोवई नाक्यावर उघडकीस आला. विसावा नाका येथुन काही युवकांनी या एस.टी.चा पाठलाग करून संबंधित कर्मचाऱ्यांचे पितळ उघड पाडल्यानंतर त्या कर्मचाऱ्याने माफीनामा दिला.
कोरोना आणि त्याच्या पाठोपाठ आलेल्या ओमायक्रॉन हे जागतिक महामारीचे संकट दुर कर अशी प्रार्थना आज ख्रिस्ती बांधवांनी येशुकडे करत साताऱ्यात नाताळ सण अत्यंत उत्साहात साजरा केला. पोवई नाका येथील टिळक मेमोरियल चर्च आणि सदरबझार येथे असणाऱ्या चर्चमध्ये आज दिवसभर ख्रिस्ती बांधवांनी येशुचा आशीर्वाद देण्यासाठी गर्दी केली होती.
कोरोनाचा कहर संपल्यानंतर जगरहाटी सुरु झाली मात्र तोपर्यंत एस. टी. कर्मचाऱ्यांनी संप सुरु केलाय. त्यामुळे सातारा शहरात ग्रामीण भागातून येणारे तसेच बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांची संख्या कमीच असल्याने साताऱ्यातील रिक्षाचालकांचा व्यवसाय मोडकळीस आलाय. मात्र, या स्थितीत देखील वाहतूक पोलिसांकडून रिक्षाचालकांना नो एन्ट्री तर कधी कोणत्याही कारणातून थेट 500 रुपयांचा दंड ऑनलार्इन त्यांच्या वाहनावर टाकला जात आहे.