अखिल भारतीय फिंगरप्रिंट परीक्षेत सातारा येथील महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियंका मारुती संकपाळ यांनी देशात प्रथम क्रमांक मिळवला.
शासनाने बैलगाडा शर्यतीवर बंदी आणल्यानंतर अनेक शेतकरी कुटुंबांवर मोठे आर्थिक संकट ओढवले. परंतु, शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी सैदापूर येथील धनाजी शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांनी शासनाकडे सातत्याने प्रयत्न केले आहेत. न्यायालयाने नुकतीच बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवत शर्यतीस परवानगी दिली आहे. त्यामुळे या लढ्यात शिंदे कुटुंबियांचे महत्वाचे योगदान असल्याचे गौरोवोद्गार माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी काढले.
गत पावसाळ्यासह त्याआधी एकदोनदा आलेल्या महापुराचा नेरळेला मोठा फटका बसला. त्यामध्ये अनेकांच्या घरांसह शेती आणि जनावरांचेही नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी भरीव निधीची तरतूद केली आहे. त्याव्दारे लवकरच नदीकाठी संरक्षक भिंत आणि घाट तयार होऊन ग्रामस्थांसाठी सुरक्षितता निर्माण होईल, असे प्रतिपादन यशराज देसाई यांनी केले.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कृष्णा अभिमत विद्यापीठ आणि कृष्णा हॉस्पिटलने कोरोनाग्रस्त रुग्णांची आपल्या परिवाराप्रमाणे काळजी घेतली. आजपर्यंत सुमारे ८००० हून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार करणाऱ्या कृष्णा हॉस्पिटलचे कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी काढले.
बेकायदेशीर कारवाया करणार्या आणि समाजाला त्रास देणार्या विविध गुन्ह्यातील सहाजणांना एका वर्षा करीता पुर्ण सातारा जिल्हा हद्दीतून हद्दपारचा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी जारी केला आहे.
सातारा तालुक्यातील वाढे गावच्या हद्दीत एका व्यावसायिकाच्या डोक्यात फरशीचा तुकडा घालून त्याला जखमी करत खिशातील अठरा हजार रुपये जबरदस्तीने काढून घेवून जीवे मारण्याची धमकी देण्याची तसेच ही भांडणे सोडवायला गेलेल्या एका हॉटेल मॅनेजरच्या डोक्यात फरशीचा तुकडा घालून जखमी करण्याची घटना बुधवार, दि. २२ रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात सहाजणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा तालुक्यातील जिहे गावच्या हद्दीत रहिमतपूर - सातारा रस्त्यावर मुंढेवाडी बसस्थानकाजवळ एका चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला असून याप्रकरणी चारचाकी चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. तानाजी भीमराव देशमुख असे जखमीचे, तर वरद कालेकर असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. दरम्यान, वरद याला रात्री उशिरापर्यंत अटक करण्यात आलेली नव्हती.
जिल्ह्यात घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे.
शेतकऱ्यांनी पिकवलेला फळे, भाजीपाला हा काही कालमर्यादे पुरताच टिकून राहतो. काल मर्यादा संपल्यानंतर त्यांचा माल हा खराब होतो व त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी प्रक्रिया उद्योगाकडे वळावे. यामुळे शेतकऱ्यांना, देशाला लाभ होईल, असे प्रतिपादन जलशक्ती, अन्न प्रक्रिया उद्योग केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल यांनी केले.
सध्याच्या परिस्थितीत राजकरण हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून सर्व प्रश्नांची उत्तरे राजकारणातच आहेत. त्यामूळे दलित-बहुजनांनी उदासिनता झटकून राजकारणात सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी केले.