येथील एका डोळ्याच्या रुग्णालयापुढे रस्त्यावर जबरी चोरीची घटना घडली असल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
येथील तामजाई नगर परिसरात वास्तव्य करणाऱ्या एका महिलेची चार जणांनी ५ लाख ५ हजार ६६२ रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
खेड, ता. सातारा गावच्या हद्दीत पोलिसांनी दारू अड्डयावर छापा टाकून २३ हजार ८०० रुपये किमतीच्या विदेशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.
जगमीन, ता. सातारा येथील एक जण सातारा बसस्थानक परिसरातून बेपत्ता झाल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
क्षेत्रमाहुली, ता. सातारा येथील तडीपार केलेल्या एकास क्षेत्रमाहुली परिसरात सातारा शहर पोलिसांनी अटक केली.
प्रवासात संतुलन बिघाडल्यानं परदेशी महिलेनं बसमधून पुढं जाण्यास नकार देत गोंधळ घातला. ती पलायन करीत असताना महामार्गावरील धावत्या वाहनाला धडकल्यानं जखमी झालेल्या महिलेवर भुईंज पोलिसांनी उपचार करुन तिला न्यायालयाच्या आदेशानं येरवडातील मनोरुग्ण रुग्णालयात दाखल केलं. नाबूनजीओ लाँय बीरुनगी (वय 40) रिपब्लिक ऑफ युगांडा असं तिचं नाव आहे.
अनुदानित शाळांसाठी विवेकानंद अकॅडमी या शाळेकरीता नजीकच्या शाळेचे अंतर 1 किलोमीटर असल्याची बाब शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणून देऊनही शिक्षण विभाग याकडे मुद्दाम दुर्लक्ष करीत आहे, असे श्री सारदादेवी चारिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती शकुंतला काटकर यांनी सांगितले.
नॉर्थरडॅम येथे खुल्या गटात पार पडलेल्या लॉन टेनिस स्पर्धेत भारताच्या विश्वजीत सांगळे याने विजेतेपद पटकावले आहे. बेनॉइट एच या फ्रान्सच्या खेळाडूचा 6-2,7-5 अशा सरळसेटमध्ये पराभव करून विश्वजीतने विजेतेपद खेचून आणले.
सातारा वनविभागाच्या वतीने कासची नाईट सफारी सुरू करण्यात आली होती. मात्र गेल्या आठवड्यापासून कास धरण परिसरात पावसाचा जोर वाढल्यामुळे ही नाईट सफारी सध्या तात्पुरती बंद करण्यात आली आहे. या निर्णयाची माहिती सातारा वनविभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात लाखो भाविक कित्येक दिवस पायी चालत त्या विठूरायाच्या दर्शनाला जातात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणारे हे भाविक पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन मिळेपर्यंत या दिवशी अतिशय भक्तीभावाने उपवास करतात. प्रत्येकाला वारीला जायला जमतेच असे नाही. पण विठ्ठलावर असलेली भक्ती आणि मोठी एकादशी म्हणून आपण हा आषाढी एकादशीचा उपवास आवर्जून करतो. एकादशी दुप्पट खाशी असं आपल्याकडे उपहासाने म्हटलं जातं. मात्र तसं न करता तब्येतीला झेपेल असा आहार घ्यायला हवा. आता उपवास म्हटल्यावर रोजच्यापेक्षा आहारात थोडे बदल केले जातात. पण ऐन पावसाळ्यात आषाढीचा उपवास करताना आहाराबाबत काळजी घ्यायला हवी (Fasting Diet Tips). पावसाळ्यात पचनशक्ती क्षीण होत असल्याने तसेच वात किंवा गॅसेसच्या समस्यांमध्ये वाढ होत असल्याने पुरेशी काळजी घ्यायला हवी.