संशयास्पद माल जवळ बाळगल्या प्रकरणी सदर बझार येथील एका भंगार व्यापार्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
राष्ट्रवादीने केलेल्या विकासकामांच्या बळावर आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा नक्की फडकेल, असा ठाम विश्वास सातारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.
सध्या श्रावण महिना सुरु असून 1 ऑगस्ट रोजी पहिला श्रावणी सोमवार आहे. महादेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी शिवलिंगावर जल अर्पण करावे. विशेषतः श्रावणातील प्रत्येक सोमवारी महादेवाची विशेष पूजा करावी. या उपायाने महादेवाची कृपा प्राप्त होते. महादेवाच्या कृपेने सर्व इच्छा पूर्ण होतात. जीवनातील अडचणी दूर होतात. येथे जाणून घ्या सोमवारी महादेवाची पूजा करण्याचा सामान्य आणि सोपी विधी... श्रावण मासात कठोर व्रत-नियम पालन करणे शक्य नसल्यास काही सोप्या विधी द्वारे पुण्य कमावता येतं.
लिंब (ता.सातारा) गावच्या हद्दीतील खंडोबा नगर (नवीन गावठाण) नावाच्या शिवारात महावितरणची सर्व्हीस केबल जळाली होती. जळालेली केबल दुरूस्त करण्यासाठी डीपी बंद करून खांबावर वायरमन चढलेला असताना डीपी सुरू केल्याने पोपट नारायण सोनमळे (रा.लिंब,ता.सातारा) याच्यावर वायरमन अभिजीत संजय भोसले (रा.गोवे,ता.सातारा) यांच्या फिर्यादीवरून सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
येथील बसस्थानकातून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
बोरगाव तालुका सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अज्ञात स्त्री अथवा पुरुष याचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.
छोटा हत्ती टेम्पो पाठीमागे घेताना एकाला धडक देऊन जखमी केल्याने चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
भ्रष्टाचारामध्ये अखंड बुडालेल्या भ्रष्टाचारी व्यक्तींनी भ्रष्टाचारावर ओरड करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, असा सणसणीत टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नाव न लगावता दिला आहे.
तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचा सत्कार समारंभ क्रीडाई सातारा यांनी उद्या दि.१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता येथील द फर्न रेसिडेन्सी या हॉटेलमध्ये घेतला असून तो समारंभ तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.