सातारा तालुक्यातील गोडोलीतून अज्ञात चोरट्याने एमएच १२ जीव्ही ५४५१ ही दुचाकी चोरुन नेली आहे.
मुळीकवाडी ता. कोरेगाव येथील अतुल धोंडिराम मुळीक वय २५, यांचा शनिवार, दि. १0 रोजी अपघात झाल्यानंतर तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आठ दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
सातारा शहरातील सदाशिव पेठ येथे वृध्द महिलेला अडवून पुढे साड्या वाटप सुरु आहे. तुम्ही इथेच बसा, असे सांगत अंगावरील दागिने काढून ठेवा, असे सांगून महिलेचे एक लाख रुपयांचा मुद्देमाल फसवणूक करत चोरुन नेला. दरम्यान, भरदुपारी घडलेल्या या घटनेने महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. फसवणूक व चोरी झाल्याचे लक्षात आल्याने महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
वाई येथे स्वतंत्र अतिरिक्त जिल्हा व सत्र दिवाणी न्यायालयास उच्च न्यायालयाने मंजुरी दिली असून वाई येथे हे न्यायालय प्रत्यक्ष सुरू होण्यासाठी पद भरतीसाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तथा विधी मंत्री यांनी तत्वतः मान्यता दिली असून लवकरच याबाबतचा निर्णय जाहीर होईल, अशी माहिती माजी आमदार मदन भोसले यांनी दिली.
कुडाळ, तालुका जावळी येथील युवा लघु चित्रपट निर्माते दिग्दर्शक अरीश इम्तियाज मुजावर यांना zeff प्लस इंटरटेनमेंटच्या तर्फे आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म फेस्टिवल मध्ये आर. जे. केराबाई ही डॉक्युमेंटरी नामांकित होऊन हरीश मुजावर यांना आज पुणे येथे गौरविण्यात आले.
फळांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स, ॲण्टीऑक्सिडंट्स आणि पोषणमुल्ये असतात. त्यामुळे दररोज एक तरी फळ खायलाच पाहिजे, असं आहारतज्ज्ञ सांगतात. त्यानुसार काही जण नियमित फळं खातातही. पण त्याचा पुरेसा लाभ शरीराला मिळत नाहीये असं काही जणांचं म्हणणं असतं. आयुर्वेदातही असं सांगितलेलं आहे की आपण जे काही खातो, ते आपल्या अंगी तेव्हाच लागतं, जेव्हा आपण खाण्यापिण्याचे काही नियम पाळतो (Food items that should be eaten together). कोणत्या पदार्थासोबत काय खावं आणि काय टाळावं, याचेही काही नियम आहेत. असेच काही नियम फळांच्या बाबतीतही आहेतम्हणूनच या लेखामध्ये आपण कोणते फळ किंवा भाजी कशासोबत खावी, जेणेकरून त्या पदार्थाचे पुरेपूर लाभ आपल्या शरीराला मिळतील, याविषयी जाणून घेणार आहोत. ही सर्व माहिती इन्स्टाग्रामच्या healthylyfff या पेजवर शेअर करण्यात आली आहे. यात सांगितलेल्या खाद्यपदार्थांच्या जोड्या एकमेकांसाठी पुरक असून त्यांचं कॉम्बिनेशन शरीरासाठी अतिशय पोषक असतं, असं यात सांगण्यात आलं आहे.
धोम कॉलनी येथे बंगल्याचे रंगकाम करत असताना शिडीवरून पाय घसरून पडल्याने प्रकाश नारायण दुर्गावळे (रा कुसगाव) यांचा मृत्यू झाला.
अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा शहर परिसरात तीन लाखांच्या जबरी चोरी प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा शहरासह जिल्ह्यातील पाचजण बेपत्ता झाल्याच्या घटना संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.