बेलवडे बुद्रुक गावावर स्व. यशवंतराव मोहिते (भाऊ), स्व. जयवंतराव भोसले (आप्पा), स्व. विलासराव पाटील (काका) यांचे विशेष प्रेम होते. स्व. मोहनराव मोहिते आणि पै. जगन्नाथ मोहिते यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा बेलवडे बुद्रुक गावाला लाभला असून तो असाच पुढे चालू राहील, असे प्रतिपादन कराड दक्षिणचे युवा नेते डॉ. अतुल भोसले यांनी केले.
स्वच्छ पर्यावरणासाठी पुढील काही वर्षांमध्ये जास्तीत-जास्त इलेक्ट्रिक वाहने वापरणे काळाची गरज आहे. भविष्यात नागरिकांनी जास्तीत-जास्त प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करणे पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
दिव्यांग व्यक्तींना दुर्लक्षित न करता समाजाने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करावा. तसेच त्यांचे आत्मबल वाढवावे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
विजय दिवस चौकातील अमर जवान स्मृती स्तंभास बांग्लामुक्ती संग्रामात भारतीय सैन्यदलाने मिळवलेल्या विजयाप्रित्यर्थ गुरुवारी माजी सैनिक, पदाधिकारी, नागरीकांनी अभिवादन केले. दरम्यान, विजय दिवसानिमित्त विजय दिवस समारोह समितीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सुप्रीम कोर्टाने बैलगाडी शर्यतीला सशर्त परवानगी दिल्यानंतर या निर्णयाचा राज्यासह ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तालुक्यातील सैदापूर- गोवारेसह अन्य ठिकाणी शेतकरी, मालक, बैलगाडी शर्यत शौकीनांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.
मलकापूर, ता. कराड येथे बुधवारी १५ रोजी भरदिवसा विश्वास हणमंत येडगे रा. मलकापूर याच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना घडली होती. लहान मुलांची भांडणे सोडविण्यासाठी गेल्याचा राग मनात धरून हा हल्ला करण्यात आला होता. यामध्ये येडगे हा गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी घटना घडल्यानंतर काही तासातच चौघांना पाठलाग करून अटक केली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाचा आज गुरुवारी १६ रोजी 39 वा दिवस असून कराड आगाराचे आजअखेर सुमारे ३ कोटी १२ लाखांचे नुकसान आहे. बुधवारी १५ रोजी ढेबेवाडी, कोल्हापूर, पुणे मार्गावर कराड आगारातील बसेस धावल्या असून बसच्या दिवसात 24 फेऱ्या झाल्या असल्याची माहिती कराडचे प्रभारी आगार व्यवस्थापक विजय मोरे यांनी दिली.
जनरल बिपिन रावत यांनी भारताच्या संरक्षण दलामध्ये अमुलाग्र बदल घडवून आणला. ते भारतीय लष्कराचे २६ वे लष्करप्रमुख होते. महाराष्ट्राचा आणि त्यांचा फार जिव्हाळ्याचा संबंध होता. त्यांच्या निधनाने देशाची फार मोठी हानी झाली असून त्यांचे कार्य देश कायम स्मरणात ठेवेल, असे मत सदगुरु गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांनी व्यक्त केले.
विजय दिवस समारोह निमित्त कर्नल संभाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार विजय दिवस समारोह समिती, कराड व यशवंतराव चव्हाण ब्लड बँक, कराड यांच्या सयुंक्त विद्यमाने गुरूवार दि. १६ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात राष्ट्रीय कार्य या भूमिकेतून मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे, असे आवाहन विजय दिवस समारोह समितीच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
बनवडी येथील ऊस तोडण्यासाठी सांगली जिल्ह्यातील एका साखर कारखान्याची ऊस तोड मजुरांची टोळी गावात आली आहे. मंगळवारी ऊस तोड मजूर गावातील एका शेतकऱ्याच्या उसाची तोडणी करण्यासाठी गेले होते. या मजुरांपैकी सोमय्या वरवी यांना 11 महिन्याची नंदिनी नावाची मुलगी होती. सोमय्या यांच्या पत्नीने ऊस तोडणी सुरू असताना नंदिनीला झोळीत झोपवून ती फडात गेली.