आ. शशिकांत शिंदे हे माझे सहकारी आहेत. परंतु, जिल्हा बँक निवडणूकीच्या राजकारणात नेमके काय घडले? हे मला माहित नाही. मी त्या प्रचार प्रक्रियेत नव्हतो. मात्र, आपण दुसऱ्यासाठी जेव्हा खड्डा खणतो, तेव्हा कधीतरी आपणही त्याच खड्ड्यात पडतो, हे त्यांनी लक्षात ठेवावे, अशी बोचरी टीका माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी आ. शशिकांत शिंदे यांच्यावर केली.
राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठी सुरु असलेल्या बेमुदत संप आंदोलनांतर्गत गुरुवारी 25 रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले. तसेच एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासाठी साकडे घालत एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारला सुद्बुध्दी देण्यासाठी प्रार्थना केली.
सातारा टपाल विभागाच्या वतीने सुकन्या समृध्दी योजनेची विशेष मोहीम 29 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या दरम्यान राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत पंचवीस हजार खाती सुरू करणार असल्याचे उदिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती प्रवर डाक अधीक्षक अपराजिता म्रिधा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रथिने, जीवनसत्त्वे यांसारख्या अनेक घटकांनी समृद्ध असलेले अंडे आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. शरीरासाठी ते खूप महत्वाचे आहे. म्हणूनच नाश्त्यामध्ये याचा समावेश करणे चांगले मानले जाते.
एसटी कर्मचारी आजही आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्याने एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून खाजगी वाहन चालकांकडून अर्थिक लूट केली जात आहे. अशावेळी सातारा आगारातून सातारा- स्वारगेट अशी शिवशाही बससेवा आजपासून सुरू करण्यात आल्याची माहिती आगार प्रमुख रेश्मा गाडेकर यांनी दिली.
गेल्या दीडदोन वर्षांपासून कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा, महाविद्यालये ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये सुरू झाली. प्रत्यक्ष वर्गात अध्ययन अध्यापन होत असल्याने विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षकवर्गही जोमाने कामाला लागला, दिवाळीच्या सुट्टी नंतर विद्यार्थ्यांच्या प्रथम सत्र परीक्षा ऑफलाइन घेण्याचे नियोजनही केलेले होते, मात्र एसटी बसेसच्या संपामुळे विद्यार्थ्यांना शाळेत तसेच महाविद्यालयात येणे शक्य नसल्याने पुन्हा एकदा विदयार्थ्यांना ऑनलाइनच परीक्षा द्याव्या लागत आहेत.
पुण्याहून साताराकडे येणार्या स्वारगेट सातारा बसवर अज्ञातांनी दगडफेक केली असल्याची घटना वाढेफाटा येथील उड्डाणपुलाजवळ दिनांक 23 रोजी रात्री दहा वाजता घडली. याप्रकरणी अज्ञातावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
येथील गोळीबार मैदान पोलीस वसाहती मधून एका पोलिसाचीच दुचाकी चोरीला गेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
पुणे- बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर खिंडवाडी नजीक असलेल्या दगडाच्या खाणीत चार दिवसांपूर्वी पाण्यावर तरंगत सापडलेल्या 28 वर्षीय युवकाचा मृतदेह अमोल डोंगरे (मूळ रा. बीड जिल्हा) यांचा असल्याची माहिती समोर आली आहे.
सातारा शहर तसेच जिल्ह्यामध्ये चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याने पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना घरफोडीचे गुन्हे उघड करण्याचे आदेश दिलेले होते. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ यांच्या अधिपत्याखाली विशेष पथकाची नियुक्ती केली होती.