अनुसुचित जाती जमातीच्या समस्या सोडविण्यासाठी आयोगाची नियुक्ती करण्यास ठाकरे सरकारने दीड वर्षाचा विलंब केला. जनहिताच्या अनेक योजनांवर स्थगिती येऊन आयोगालाही टाळे लावण्यात आले. या आयोगाचे अस्तित्व कागदोपत्रीच ठेवून ठाकरे सरकारने अनुसुचित जाती जमातीची घोर फसवणूक केली आहे. असा घणाघाती आरोप भाजपचे माजी सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी पत्रकार परिषदेत केला.
मात्र हे माझ्या रक्तात नाही. पक्षाच्या चौकटीबाहेर जायचे नव्हते. भविष्यात पक्षवाढीसाठी मी काम करणार आहे. मात्र, पक्षश्रेष्ठींनी जिल्ह्यातील आमदारांचे संख्याबळ का घटले? याचा विचार करावा, अशा शब्दात आ. शशिकांत शिंदे यांनी पराभवावर भाष्य केले.
गत काही महिन्यांपासून सुपने, पश्चिम सुपने, केसे, पाडळी, तसेच तांबवे विभागात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. तसेच बिबट्याने हल्ले करून अनेक पाळीव प्राणी मारले असून माणसांवरही बिबट्याने जीवघेणे हल्ले केले आहेत.
सातारा जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. देशरक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या जवानांमध्ये आपल्या जिल्ह्यातील जवानांची संख्या नेहमीच अधिक राहिली आहे. केवळ युवकच नव्हे तर, आता मुलीही सैन्यात भरती होत असून गांजे येथील शिल्पा चिकणे या युवतीने सैन्यात भरती होऊन अनोखा इतिहास घडवला आहे.
नांदलापूर ता. कराड गावच्या हद्दीत पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाला दुचाकीची धडक बसल्याने दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या युवतीचा रस्त्यावर आदळून जागीच मृत्यू झाला. तर तीन वर्षाच्या मुलीसह युवक गंभीर जखमी झाला आहे. बुधवारी २४ रोजी रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
फलटण शहरातील एका उपनगरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीची वारंवार छेड काढणार्या संशयित रोहीत ज्ञानदेव कांबळे (रा.फलटण) याला विशेष जिल्हा सत्र न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
पुणे- बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर सातारा शहरानजीक खिंडवाडी येथे झालेल्या खून प्रकरणी शहर पोलिसांनी दोघांना अटक केली असून संशयित व मृत हे आतेभाउ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, अद्याप खूनाचे नेमके कारण काय? हे गुलदस्त्यात असून पोलिस संशयितांकडे कसून चौकशी करत आहेत.
सातारा शहरातलगत असलेल्या एका उपनगरात महिलेला भररस्त्यावर अडवून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून आदित्य सपकाळ (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मृत मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या पश्चात पत्नी व मुलगा असतानाही त्याला कोणी वारस नसल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र तयार करून संपत्ती हडप करण्याचा प्रयत्न केल्याने इंदुमती रामदास चव्हाण, रामदास बाजीराव चव्हाण (दोघे रा. एकंबे,ता.कोरेगाव) यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कालगाव, ता. कराड येथील शेतकऱ्यांच्या १२ एकर जमीनीवर १९६८ साली भुसंपादन झाल्याचे आवार्ड दाखवत १ मार्च २०२० रोजी भुमी अधिक्षक कार्यलय व प्रांत कार्यलय यांनी परस्पर फेरफार करत ७/१२ वर रेल्वेचे नाव लावण्यात आल्याने त्याविरुद्ध बाधित शेतकरी योगेश जगन्नाथ चव्हाण व इतर शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.