येणके, ता. कराड येथे काही दिवसांपूर्वी बिबट्याने ऊसतोड मजुराच्या मुलावर हल्ला करून त्याला ठार केल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेने जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडाली होती. अखेर सुमारे आठवडाभराच्या प्रयत्नानंतर बिबट्याला सापळ्यात कैद करण्यात वनविभागाला यश आले आहे. मात्र, एका बिबट्याला कैद केल्यानंतर सुमारे तासाभरातच येणके गावामध्येच दुसऱ्या बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.
चाळकेवाडी, ता. सातारा येथे पवनचक्कीमधील साहित्याची चोरी झाली असल्याची घटना घडली आहे.
वडूथ, ता. सातारा येथे झालेल्या घरफोडीत सुमारे तीन लाखांचा सोन्या-चांदीचा ऐवज चोरट्यांनी लांबवला असल्याची घटना घडली आहे.
सातार्यातील एसटी स्टॅन्ड पाठीमागे पारंगे चौकात मुंबईची प्रवासी असणार्या महिलेची पर्स धूम स्टाईलने आलेल्या बाईकर्सने चोरी केली. याप्रकरणी अर्चना श्रीरंग ढगे (वय 29, सध्या रा.दहिसर, मुंबई मूळ रा.सातारा) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
सोशल मीडियावर खोटी कागदपत्रे बनवून साखर कारखान्याची बदनामी होईल, अशी पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी एकावर कराड शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी २६ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत कारखान्याच्या प्रशासन विभागातील क्लार्क रणजीत कदम यांनी फिर्याद दिली आहे. ओमकार अरुण साळुंखे रा. रेठरे खुर्द ता. कराड असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
आपण रोजच्या जेवणात अनेक खाद्यपदार्थांमध्ये तूप वापरतो. त्यात असे अनेक पोषक घटक असतात. जे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप चांगले ठरतात. आयुर्वेदातही याला औषध मानले जाते. प्राचीन काळापासून शरीरातील रोगांची लक्षणे नष्ट करण्यासाठी सात्विक आहारात तुपाचा वापर केला जातो. देशी तूप अन्नाला चव आणि गुळगुळीतपणा तर देतोच, पण त्यात भरपूर पोषकही असतात.
भारतामध्ये २६ जानेवारी १९५० रोजी संविधान लागू करण्यात आले. परंतु, २६ नोव्हेंबर १९४९ रोजीच संविधान औपचारिकरीत्या स्वीकारण्यात आले होते. त्यामुळे देशातील तरुणांमध्ये संविधानाच्या मुल्यांचा प्रसार करण्यासाठी जागृती करण्याच्या उद्देशाने २६ नोव्हेंबर रोजी देशभरात संविधान दिन साजरा करण्यात येतो. त्यानुसार शुक्रवारी संविधान दिनानिमित्त कराड शहर मनसेच्या वतीने संविधान प्रस्तावना प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
तुकाराम ओंबळे हे फक्त केडंबे गावचे नव्हे तर ते या देशाचे सुपुत्र आहेत. त्यामुळे त्यांचा शौर्याचा हा दिवस शासकीय इतमामात झाला पाहीजे. तरच येणाऱ्या पिढीमध्ये देशभक्ती राष्ट्रभक्ती निर्माण होईल, असे उद्गार शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील यांनी काढले.
ज्या श्री. छ. प्रतापसिंह हायस्कूलमध्ये भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्या शाळेतील शिक्षकांनी तसेच दलित शक्ती केंद्र संर्स्थेतर्फे विविध उपक्रमांच्या माध्यमातून संविधान दिन साजरा झाला. यावेळी विद्यार्थ्यांच्या मनात संविधानाची स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही तत्वे रुजावित यासाठी माहितीपत्रकाच्या माध्यमातून संविधानाची माहितीही देण्यात आली.
सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफआरपी ची एकरकमी पंधरा टक्के व्याजासह बिलं शेतकर्यांच्या खात्यावर जमा केली नाही. तसेच शेतकर्यांना साखर कारखानदार योग्य उसदर देत नाही या मागण्यांवर वारंवार बैठका चर्चेच्या पलीकडे काहीच होत नाही. या अन्यायाच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 1 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता सातारा कोरेगाव मार्गावर बेमुदत रास्ता रोकोचा इशारा दिला आहे.