maharashtra

शहीद तुकाराम ओंबळे हे केडंब्याचे नव्हे तर ते देशाचे सुपुत्र : नितीन बानुगडे-पाटील


Martyr Tukaram Ombale is not the son of Kedambe but the son of the country: Nitin Banugade-Patil
तुकाराम ओंबळे हे फक्त केडंबे गावचे नव्हे तर ते या देशाचे सुपुत्र आहेत. त्यामुळे त्यांचा शौर्याचा हा दिवस शासकीय इतमामात झाला पाहीजे. तरच येणाऱ्या पिढीमध्ये देशभक्ती राष्ट्रभक्ती निर्माण होईल, असे उद्गार शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील यांनी काढले.

केळघर : तुकाराम ओंबळे हे फक्त केडंबे गावचे नव्हे तर ते या देशाचे सुपुत्र आहेत. त्यामुळे त्यांचा शौर्याचा हा दिवस शासकीय इतमामात झाला पाहीजे. तरच येणाऱ्या पिढीमध्ये देशभक्ती राष्ट्रभक्ती निर्माण होईल, असे उद्गार शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील यांनी काढले.
केडंबे, ता. जावली येथे शहीद तुकाराम ओंबळे यांच्या जन्मगावी शौर्यदिनाचे औचित्य साधुन श्रध्दांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसगी शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील बोलत होते.
प्रारंभी शहीद तुकाराम ओंबळे याच्या प्रतिमेस पुष्पचक्र मान्यवरांच्या हस्ते वाहण्यात येऊन दिपप्रज्वलन करण्यात आले. शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाला उभे करण्यासाठी १३ वर्षे लागत असतील पण १३ सेकंद कसाबला पकडण्यासाठी उशिर झाला असता तर १६ जणांचे पथक आज राहीले नसते आणि तो कसाब पसार होवुन त्याने आणखीत दहशती हल्ले केले असते. परंतु अंगावर गोळ्यांचा वर्षाव होत असताना, रक्ताच्या चिळकांड्या उडत असताना त्या कसाबला मिठी मारणाऱ्या तुकाराम ओंबळेंनी पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणला. ते तुकाराम ओंबळे हे फक्त केडंबे गावचे नव्हे तर ते या देशाचे सुपुत्र आहेत. त्यामुळे त्यांचा शौर्याचा हा दिवस शासकीय इतमामात झाला पाहीजे. तरच येणाऱ्या पिढीमध्ये देशभक्ती राष्ट्रभक्ती निर्माण होईल, असे उद्गार शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील यांनी काढले.
यावेळी माजी आ. सदाभाऊ सपकाळ, शिवसेना क्षेत्र प्रमुख एस. एस. पार्टे, प्राचार्य प्रमोद घाडगे, प्रांत राजेश टोम्पे, तहसिलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी रमेश काळे, सहा. पोलीस निरीक्षक अमोल माने, सातारा जावली विधानसभा संपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे, आदिनाथ ओंबळे, शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव, जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे, विजयराव मोकाशी, तालुका प्रमुख विश्वनाथ धनावडे, सचित जवळ, नामदेव बांदल, सचिन मोहीते जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना बानुगडे-पाटील म्हणाले, लढणे या रक्ताच्या मातीत आहे. राजासाठी माणस मरत असत. पण राज्यासाठी मरायला छत्रपती शिवरायांनी शिकवल म्हणुन ती परंपरा पुढे सुरु राहीली. या परंपरेचे दैदिप्यमान पर्व म्हणून तुकाराम ओंबळे याच्या शौर्याचा उल्लेख आम्हाला करावाच लागेल. त्यामुळे हा दिवस शोर्य दिवस म्हणुन साजरा करतो आहोत असे सांगुन शहीदांना मिळालेला हा सर्वात मोठा सन्मान आहे असे सांगुन ते होते म्हणून आपण आहोत. त्यांनी १३ सेकंद उशिर केला असता तर चित्र वेगळ दिसल असत, असेही पाटील यांनी सांगितले.
मुंबईवर झालेला हल्ला हा काळा दिवस होता. १० दहशतवाद्यांनी ताज हॉटेल नरिमन पॉइंट ओबरॉय हॉटेल येथे उच्छाद मांडला होता. शिवाजी टर्मिनसवर अंधाधुंद गोळीबारात 30 जण मेले, तर ३०० जण जखमी झाले. ६० तास सुरु असलेल्या दहशती कारवाईत जनता भयभीत होती. अशावेळी रात्री १२.३० वा. दोन अतिरेकी गिरगाव चौपाटीवर स्कोडा गाडीतुन येत असल्याचा मॅसेज मिळताच १६ जणांचे पथक रवाना झाले. त्यामध्ये तुकाराम ओंबळे यांनी छातीवर गोळ्या झेलत इतरांचे प्राण वाचविले आणि पाकिस्तानचा खरा चेहरा जगा समोर आणला. हा इतिहास पिढीला सांगायचा असेल तर असा छोटेखानी कार्यक्रम होऊन चालणार नाही तर तो शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे, असे मत इतिहास सांगताना बानुगडे पाटलांनी सांगितले.
यावेळी प्रांताधिकारी राजेश टोम्पे यांनी स्मारकाच्या जागेचा प्रश्न मिटवला असुन स्मारकाचा प्रश्न लवकरच मिटवीला जाईल. प्रशासन पुर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन यावेळी दिले. विजराव मोकाशी यांनी पत्रकारांनी शासनावर वारंवार आवाज उठविल्याने स्मारकाच्या जागेचा प्रश्न मार्गी लागला असून लवकरच स्मारकाचा प्रश्न सुटेल मार्गी लागेल असे सांगुन शेती कॉलेजचा प्रस्ताव तयार करून शहीद औबळेंच्या नावाने सुरु व्हावे यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. यावेळी शिवसेनेचे जेष्ठ नेते एस. एस. पार्टे यांनी स्मारकासाठी आम्ही पाच कोटी, दहा कोटी दिले असे खोटे सांगुन जनतेची दिशाभुल करू नका, असे सांगितले.