maharashtra

राज्यातील हवामान सतत बदलत असून थंडी गायब झाली आहे.

The weather in the state is constantly changing and the cold has disappeared.

The weather in the state is constantly changing and the cold has disappeared.

राज्यातील हवामान सतत बदलत असून थंडी गायब झाली आहे. किमान तापमानात वाढ झाली असून, दुपारच्या वेळी उन्हाचा चटका जाणवत आहे. अशातच काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.राज्यातील हवामान सतत बदलत असून थंडी गायब झाली आहे. किमान तापमानात वाढ झाली असून, दुपारच्या वेळी उन्हाचा चटका जाणवत आहे. अशातच काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात थंडी कमी राहणार असून आज कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. सोमवारी धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्याचे नीचांकी १२.८ अंश तापमान नोंदवण्यात आलं आहे. राज्यात ६ अंशांपर्यंत आलेले किमान तापमान पुन्हा १२ अंशांहून अधिक झालं आहे. बहुतांश ठिकाणी तापमान १४ अंशांच्या वर गेल्याने थंडी गायब झाल्याचं पाहायला मिळत असून दुपारच्या वेळी उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. तसंच उकाडा जाणवू लागला आहे.

कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता?

दक्षिण भारतासह, कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात ढग दाटून आले असून पावसाला पोषक हवामान झालं आहे. राज्यात आज तापमानातील वाढ कायम राहणार असून, राजधानी मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये ढगाळ आकाश, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, मागील आठवड्यात संपूर्ण राज्यभरात थंडीची लाट पसरली होती. सकाळसह रात्री थंडीचा कडाका सर्वांना जाणवत होता. परंतु, अचानक निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणाने थंडीत घट झाली असून लोकांना उबदार हवामानामुळे दिलासा मिळत असल्याचं चित्र आहे. मात्र याचा विपरीत परिणामी शेतातील पिकांवर होणार असून पिकांवरील रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. पुढील काही दिवस हवामानात असेच बदल दिसण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसंच तापमानात होणाऱ्या चढउतारांसाठी नागरिकांनी तयार राहण्याबाबतचं आवाहनही हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.