maharashtra

एकरकमी एफआरपी च्या मुद्यावर बळीराजा आक्रमक

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा 1 डिसेंबर रोजी रास्ता रोको चा इशारा

Baliraja is aggressive on the issue of unilateral FRP
सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफआरपी ची एकरकमी पंधरा टक्के व्याजासह बिलं शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा केली नाही. तसेच शेतकर्‍यांना साखर कारखानदार योग्य उसदर देत नाही या मागण्यांवर वारंवार बैठका चर्चेच्या पलीकडे काहीच होत नाही. या अन्यायाच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 1 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता सातारा कोरेगाव मार्गावर बेमुदत रास्ता रोकोचा इशारा दिला आहे.

सातारा : सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफआरपी ची एकरकमी पंधरा टक्के व्याजासह बिलं शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा केली नाही. तसेच शेतकर्‍यांना साखर कारखानदार योग्य उसदर देत नाही या मागण्यांवर वारंवार बैठका चर्चेच्या पलीकडे काहीच होत नाही. या अन्यायाच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 1 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता सातारा कोरेगाव मार्गावर बेमुदत रास्ता रोकोचा इशारा दिला आहे.
या इशार्‍याचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांना देण्यात आले. या निवेदनात नमूद आहे उसदर नियंत्रण कायदा 1966 प्रमाणे साखर कारखान्यांनी एकरकमी रक्कम शेतकर्‍याच्या खात्यात चौदा दिवसाच्या आत जमा करावयाची आहे. तसेच बळीराजाच्या हककाचा कायदेशीर उसाचा दर सुद्धा द्यावयाचा आहे. मात्र सातारा जिल्ह्यात गळीत हंगाम सुरु होऊन महिना उलटला तरी अघाप एफआरपी ची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात जमा झालेली नाही.
महावितरणच्या वतीने शेतीपंपाची खोटी बिले दिले जात असून ती देणार्‍यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. गेली दहा वर्ष शेतीपंपाची बिले देण्यात आली नाही त. वीज बिल वसुलीच्या योजना लागू करून ते वीजबिल दमदाटी करून सर्रास वसूल केले जात आहे. शेतकर्‍यांना बिलाचा हिशोब समजेल या पद्धतीने वसुली करण्यात यावी.
या दोन प्रमुख मागण्यांची राज्य शासनाने गंभीर दखल घेऊन त्याची सोडवणूक करावी. अन्यथा शेतकर्‍यांच्या साथीने स्वाभिमानी शेतकरी संघटना 1 डिसेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता बॉम्बे रेस्टॉरंट चौकात बेमुदत उपोषण करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.