महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने ऑगस्ट 2019 मध्ये घेण्यात आलेल्या आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत आगाशिवनगर (मलकापूर) ता. कराड येथील कु. ऐश्वर्या वसंतराव शिंदे हिने राज्यात गुणवत्ता यादीत 13 वा क्रमांक मिळवला आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आहे.
कराड नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीने २०१७-१८ या वर्षात केलेल्या उत्कृष्ट कार्याची राज्यस्तरावर नोंद घेण्यात आली आहे. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेने 'ब' वर्ग नगरपालिका गटात कराड नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीला राज्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
किल्ले अजिंक्यतारा किल्ल्यावर जाणाऱ्या मार्गालगत गटाराचे काम निकृष्ट झाल्याचा भांडाफोड शिवसेनेने केला होता. या कामाची जबाबदारी सातारा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी नाकारली आहे. ते काम आम्ही केले नसल्याची माहिती संबंधितांनी दिल्याने या गटार बांधकामाच्या प्रकरणात नवीन वळण आले आहे.
श्री. छ. प्रतापसिंह महाराज नगर वाचनालयाच्या निवडणुकीत सत्ताधारी ग्रंथमित्र पॅनलने सर्वच म्हणजे बाराही जागा जिंकून विरोधकांना धोबीपछाड दिला . विरोधकांनी मिळवलेल्या मतांनी सत्ताधारी गटाला आत्मपरीक्षण करायला लावले आहे.
उसाचा रस आणि बोयोसिरपवर आधारित आशियातील सर्वांत मोठा इथेनॉल प्रकल्प फलटणमध्ये उभारत असल्याची घोषणा स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युएल लिमिटेडने केली आहे. प्रकल्पाची क्षमता पहिल्या टप्प्यात प्रति दिन 500 व दुसर्या टप्प्यात 1100 किलो लिटरपर्यंत वाढवली जाणार असून, यासाठी आवश्यक मान्यता मिळाली असल्याचेही सांगण्यात आले आहे. हे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रयत्नांचे यश मानण्यात येत आहे.
भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने असंघटित क्षेत्रातील कामगारांना मोफत ई-श्रम कार्डचे वाटप करण्यात आले. यामध्ये मंगळवार पेठ प्रभागातील असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नूतन संचालक राहुल महाडिक व भाजपचे ज्येष्ठ नेते विष्णू पाटसकर यांच्या हस्ते ई-श्रम कार्डचे वाटप करण्यात आले.
शहरातील कार्वेनाका येथील थोरात हॉस्पिटलशेजारी बंद फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील सुमारे अडीच लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला. रविवारी 16 रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. याबाबत संतोष शंकर जाधव रा. मलकापूर यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
'तू आता लग्न कर नाहीतर तुला सोडतच नाही,' असे म्हणून फलटण येथील एका युवकाने सातारा येथील करंजे पेठेत राहणाऱ्या एका वीस वर्षीय युवतीचे अपहरण केल्याची घटना सातारा शहर परिसरात घडली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे.
कराड येथे बंगल्याचे काम करण्यासाठी तसेच पुणे येथे फ्लॅट घेण्यासाठी माहेरुन वीस लाख रुपये आणावेत, अशी मागणी करत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पाच जणांवर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा येथील पोलीस वसाहतीत राहणाऱ्या आणि भरोसा सेलमध्ये कार्यरत माहिला पोलीस अंमलदार संगीता जेटाप्पा लोणार - काळेल या स्वंयपाक घरात गॅसचा भडका झाल्याने गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरु होते. दरम्यान, शनिवार, दि. १५ रोजी रात्री उशिरा त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.