सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरु असणाऱ्या बारा जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी १८ हजार ८०७ रुपये व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.
देगाव फाटा, ता. सातारा परिसरातील एका चिकन सेंटरच्या समोरून एका महिलेचा ८ हजार रुपये किमतीचा मोबाइल अज्ञात चोरट्यांनी जबरदस्तीने चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली.
परळी, ता. सातारा येथील वीज वितरण कंपनी कार्यालयाबाहेर येऊन विद्युत पुरवठा आठ तासाऐवजी सहा तास करत अधून-मधून विद्युत पुरवठा बंद का करता अशी विचारणा करत गर्दी, मारामारी केल्याप्रकरणी १५ जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
कराड नगरपालिकेत मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत नाव नोंदणी सुरू करण्यात आली आहे.
सातारा जिल्हयासाठी जिल्हादंडाधिकारी यांनी कोविड-१९ बाबत सुधारित आदेश पारीत केले आहेत.
सातारा शहराची हद्दवाढ होऊन सुमारे दोन वर्षे उलटली तरी अद्यापही सातारा शहराच्या नवीन प्रभागात घंटागाडी सेवा अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. याचे मूळ कारण आरोग्य विभागाचे घंटागाडीचे टेंडर प्रशासकीय घोळा मध्ये अडकून पडले आहे. फाईल जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलावर असूनही अद्याप त्यावर सही झालेली नाही.
सातारा नगरपालिकेच्या प्रभाग रचना संदर्भात जी गोपनीयता बाळगायची आहे त्याचा सातारा नगर पालिका प्रशासन व मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडून गोपनीयता भंग झाल्याची तक्रार मंगळवार पेठ येथील रहिवासी हरी रामदास शिवशरण यांनी निवडणूक आयोगाकडे पत्रकाद्वारे केली आहे. या गोपनीयता भंगाची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
कोयना धरण परिसराला मंगळवारी सकाळी ९.४७ वाजता भूकंपाचा सौम्य धक्का या परिसरात बसलाय. भूकंपमापन यंत्रावर या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता ३.३ रिश्टर स्केल एवढी होती, तर भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना विभागातील काडोली गावाच्या पश्चिमेला ७ किमी अंतरावर होता.
"संतान जन्माला येणे सोपं आहे. पण त्यांच्यावर संस्कार करणं अवघड आहे. जोपर्यंत संतान हाताच्या आणि हाकेच्या अंतरावर आहे. तो पर्यंत ती सुधारु शकते. नाहीतर ती हाताबाहेर जाते." असा संदेश देणारा "आप्पा काळजी घ्या" या लघु चित्रपटाचे नुकतेच जळगाव येथील देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल मध्ये नामांकन झाले.
दरम्यान, प्रत्येक पोलीस ठाण्याच्या आवारात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे संपर्क फलक दर्शनी भागात का लावले नाहीत? याबाबत चौकशी करून, फलक न लावणाऱ्या पोलीस प्रमुखावर कडक कारवाई करणं गरजेचं आहे. तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यामध्ये; लाचखोराला कडक शिक्षा होण्यासाठी प्रभावी बदल होणंही आज काळाची गरज आहे. कारण लाचखोराला कडक शिक्षा; हाच मोठा उपाय, भविष्यातील अनेक लाचखोरी प्रकरणांना आळा घालणारा ठरू शकतो आणि राज्यात पोलिसांच्या डागाळलेल्या प्रतिमेला थोडाफार का होईना उजाळा मिळू शकतो.