मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी केलेली आरपारची लढाई धारदार झाली आहे. सातारा जिल्ह्यातही या आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटत असून दिवसेंदिवस सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर बसलेल्या उपोषणकर्त्यांना समाजाच्या विविध स्तरातून वाढता पाठिंबा मिळत आहे.
गळफास घेऊन एका युवकाने आत्महत्या केल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
बेदरकारपणे रिक्षा चालवल्याप्रकरणी चालकाविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका रिक्षा चालकास जखमी केल्याप्रकरणी ॲम्बुलन्स चालकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दोघांना मारहाण केल्याप्रकरणी आठ जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोरगाव पोलिसांनी एकाच दिवशी दोन स्वतंत्र कारवाया करीत 1 लाख 56 हजार 500 रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात यश मिळवले आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
समाजासाठी दक्ष असणार्या आणि कर्तव्यावर कायम असणार्या परंतू अडचणीत सापडलेल्या दोन महिला कॉन्स्टेबलना अर्ध्या रात्री मदत करुन शिवबा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा सविता शिंदे यांनी खरोखरीच माणुसकी जिवंत असल्याची चुणूक दाखवून दिली आहे. त्यांच्या या कार्याचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे.
गोजेगाव ता. जि. सातारा येथील तेजस्विनी भास्कर चव्हाण यांनी सकल मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण न देता स्वातंत्रपणे आरक्षण द्यावे. या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळातील ज्येष्ठ नेते असलेले भाऊसाहेब सोमण म्हणजे सामाजिक व राजकीय कार्यातील दीपस्तंभ म्हणावे लागेल असे व्यक्तिमत्व होते, असे गौरवोद्गार ज्ञानश्री इन्स्टिट्यूट चे संस्थापक व सहकार चळवळीतील एक अग्रणी भाई ज्ञानेश्वर वांगडे यांनी सातारा येथे एका कार्यक्रमात बोलताना काढले.
कोणीही राजकीय नेत्यांनी मराठा आंदोलनाच्या मंडपात फिरकायचे नाही, अशा शब्दात आमदार शशिकांत शिंदे यांना मराठा आंदोलनकर्त्यानी सुनावत आता तुम्ही काय करणार समाजासाठी ते सांगा, असे प्रश्न विचारुन त्यांना जेरीस आणले.