नागेवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत जुगार अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी ४६० रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.
गोडोली, ता. सातारा येथून मायलेकी बेपत्ता झाल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
मोटारसायकल चोरी प्रकरणी अभिजीत राजाराम लोहार वय ३४ रा. आंबवडे बुद्रुक ता. जि. सातारा सध्या रा. मंगळवार पेठ, सातारा या अट्टल चोरट्यास अटक करण्यात आली. यावेळी त्याच्याकडून तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
गोंदवले खुर्द, ता. माण गावच्या हद्दीत अज्ञात कार चालकाने दिलेल्या दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाल्याने अज्ञात कार चालकावर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे
कापशी ता. फलटण येथील शरयू साखर कारखान्याचा ट्रक हा कारखान्यातून साखर भरून सातारकडे जात होता. दरम्यान, आदर्की गावाबाहेरील माळवाडा बसथांबा व कड्यातील पुलाच्या वळणावर ट्रकचालकास वळणावरील रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रक जागेवरच पलटी झाला. यामध्ये सुदैवाने जीवित हानी कोणतीही झाली नाही.
अवैध वीज कनेक्शन मुळे मोठ्या प्रमाणावर प्राण्यांना शॉक लागून त्यांचा मृत्यु होत असल्याने अशा वीज कनेक्शन धारकांवर कारवाई करावी, असे पत्र आपण सातारा येथील वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांना दिले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली.
मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती आणि ऐतिहासिक शाहूनगरी चे संस्थापक छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सातारा शहरातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली होती, या मिरवणुकीचे आयोजन शाहूनगरी फाउंडेशनच्या संस्थापक वृषालीराजे भोसले यांच्या वतीने करण्यात आले होते. या पालखी सोहळ्यामध्ये सातारकर मंडळी उत्स्फूर्तपणे सहभागी झाली होती.
सातारा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा प्राथमिक कार्यक्रम सुरू झाला आहे. सातारा जिल्ह्यातील नऊ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभागरचनांवर हरकतींचा कार्यक्रम जाहीर झाला असून मंगळवारी संपलेल्या मुदतीपर्यंत जिल्ह्यातून एकूण 59 हरकती नगरपरिषद संकलन कक्षाकडे दाखल झाल्या आहेत. या हरकतींवर दिनांक 19 व 20 रोजी सुनावणी होणार आहे.
सातारा शहरासह विस्तारित भागातील नागरिकांना सोयी-सुविधा देण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून शासनाने ४८ कोटी रुपये मंजूर केले. पैकी २५ कोटींचा निधी पालिकेकडे आला असून मे अखेर आणि २३ कोटी रुपये जमा होतील. शहराच्या पूर्वेला असणाऱ्या विलासपूर भागाच्या पायाभूत सुविधांसाठी बारा कोटी रूपये दिले जाणार आहेत, अशी माहिती येथील युवा उद्योजक संग्राम बर्गे यांनी दिली.
सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे आमदार जयकुमार गोरे यांना बुधवारी त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात दिलासा मिळाला आहे. आमदार गोरेंनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. त्यामुळे त्यांच्यावरील अटकेची कारवाई टळली आहे.