इंद्रधनु विचारमंच फौंडेशनने टेंभू येथे आगरकरांच्या नावे पुरस्काराचा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. या प्रेरणादायी उपक्रमामुळे गुणवंत पत्रकारांबरोबरच टेंभू हे प्रबोधनाचे ज्ञानतीर्थ म्हणून गौरवले जाईल, असा विश्वास ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी व्यक्त केला.
भारतीय दलीत पँथरपासून कार्यरत असलेले फलटण येथील लढाऊ पँथर चंद्रकांत अहिवळे यांचे अल्पशा आजाराने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सातारा येथे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण आंबेडकरी समाजात दुःख व्यक्त केले जात आहे.
मायणी येथील मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याचा गुन्हा भाजपचे माण-खटावचे आ. जयकुमार गोरे यांच्यावर दहिवडी पोलिसांत गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीनासाठी आ. गोरेंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. बुधवारी त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने त्यांना शरण येण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांना चार आठवडे अटकेपासून दिलासाही दिला आहे.
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाढे फाट्यावर कंटेनरने एसटीला धडक दिल्याने एसटीचे मोठे नुकसान झाले. मात्र, सुदैवाने एसटीतील प्रवाशांना कोणतीही जखम झाली नाही. हा अपघात १२ जुलै रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास झाला. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात कंटेनरचालकावर गुन्हा दाखल झाला आहे.
आसु, ता. फलटण येथे विहिरीत पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
राजाळे, ता. फलटण येथे विजेचा शॉक लागून एका महिलेचा मृत्यू झाल्याची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.
रंगनाथ स्वामींची निगडी, ता. सातारा येथून एक महिला बेपत्ता झाल्याची तक्रार रहिमतपूर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
ठोसेघर, ता. सातारा येथे सुरू असणाऱ्या दारू अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी ३ हजार ६०० रुपये किमतीच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.
चाफळ येथील प्रसिद्ध असलेल्या श्रीराम मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव संपन्न झाला. यावेळी समर्थ सभागृहामध्ये समर्थ वंशज भूषण स्वामी महाराज यांच्याकडून गुरु मंत्र देण्यात आला.
वीज वितरण कंपनीने महाराष्ट्रात इंधन अधिभार 20 टक्के वाढवल्याने आम आदमी पार्टीने याचा निषेध म्हणून सातार्यात बुधवारी कंदील आंदोलन केले. तसेच यावेळी आंदोलकांच्या वतीने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना निवेदन सादर करण्यात आले.