स्वराज्य नागरी सहकारी पतसंस्थेच्या फसवणुकीच्या तक्रारीवरुन फलटण पोलिसांनी दिगंबर आगवणे यांना अटक करुन त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केली होती. त्यानंतर आता आगवणे यांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली असून दुसऱ्या एका आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात त्यांना फलटण पोलिसांनी अटक केली
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त वीरांगना प्रतिष्ठान, सैनिक फेडरेशन, इनरव्हील क्लब आँफ कँम्प सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने देश सेवेत हुतात्मा झालेल्या वीर जवानांच्या वीर पत्नींचा सन्मान करण्यात आला.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा ‘एका दशकातील सतत सर्वोत्कृष्ट कामगिरी’बद्दल केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या शुभ हस्ते तसेच सहकार राज्यमंत्री ना. बी.एल. वर्मा, भारतीय रिझर्व्ह बँक आणि नाबार्डचे प्रतिनिधी तसेच इतर मान्यवर यांचे प्रमुख उपस्थितीत ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वेळा दिल्ली दौरा केला. महाराष्ट्रात जे सत्तांतर झाले आणि विकास कामांची जी आव्हाने आहेत. त्याकरिता त्यांनी नीती आयोगाकडे प्राधान्य क्रमाने करावयाच्या कामांसाठी अठरा हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे.
सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा आहे. या जिल्ह्याला देशभक्ती आणि देशसेवेची जाज्वल्य परंपरा आहे. जिल्ह्यातील केंद्रीय शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून येथे केंद्रीय विद्यालय तातडीने उभारले जावे याकरिता पाच एकर जागा उपलब्ध आहे. त्यामुळे सीबीएसई पॅटर्नचे केंद्रीय विद्यालय उभे रहावे, अशी आग्रही मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे केली.
उडतारे, ता. वाई येथून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रल्हाद उर्फ परल्या रमेश पवार, वय २२, रा. केसरकर पेठ झोपडपट्टी, सातारा असे त्याचे नाव आहे.
सातारा शहर व शाहूपुरी पोलिसांच्या हद्दीत विविध गुन्हे करणाऱ्या दोघांना हद्दपार प्राधिकरण तथा जिल्हा पोलीस प्रमुख अजय बन्सल यांनी सातारा जिल्ह्यातून सहा महिन्याच्या कालावधीसाठी तडीपार केले आहे. ऋतिक जितेंद्र शिंदे, वय २३, रा. गोडोली, ता. सातारा आणि अक्षय उर्फ बॉम्बे सुनील जाधव, वय २८, रा. बसप्पा पेठ, सातारा अशी त्यांची नावे आहेत.
दि. 12 रोजी यवतेश्वर घाटातील एका वळणावर एक मारुती आल्टो कार तब्बल 700 फूट दरीत कोसळली. या कारमध्ये सातजण असल्याची माहिती आहे. यांमधील दोघांची प्रकृती गंभीर आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे बहुतांश धरणे ओव्हर फ्लो झाल्यामुळे आज कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटांनी उचलले. त्यामुळे नदीपात्रात प्रति सेकंद १० हजार १०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.