वाहतुकीसाठी असणाऱ्या नियमांचे पालन केले जात नाही. सीट बेल्ट बांधणे, हेल्मेट वापरणे, बेगमर्यादेचे उल्लंघन करणे असे प्रकार अद्याप सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे अपर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांनी केले.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांबाबत जे वादग्रस्त विधान केले, त्याचा आम आदमी पार्टीच्यावतीने सातारा शहरातील शिवतीर्थावर निषेध नोंदविण्यात आला. तसेच कोश्यारी यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
एकाला मारहाण, शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सुऱ्याने वार केल्या प्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
इंदोली येथे मध्यरात्री ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला अज्ञातांनी आग लावली. यामध्ये नवा कोरा ट्रॅक्टर जळून खाक झालाय. दरम्यान ही आग कोणी लावली याबाबत उलटसुलट चर्चा सुरुवात झालीय. ऊस दर प्रश्नांवर शेतकरी संघटनांनी गनिमी कावा सुरू केल्याच शेतकऱ्यांमधून बोललं जात आहे.
फलटणमध्ये नवजात स्त्री जातीचे अर्भक सापडले असून हे अर्भक बाल शिशुगृहात पुढील संगोपनासाठी दाखल केले आहे.
उंब्रज, तालुका कराड येथे एक महिन्यापूर्वी बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने कौशल्यपूर्ण तपासानंतर अटक केली आहे.
शिक्षक बँक निवडणुकीत सत्तांतर होत बलवंत पाटील यांच्या सहकार परिवर्तन पॅनेलने १७ जागावर दणदणीत विजय मिळवून पुस्तके गटाच्या सभासद विकास पॅनेलचा धुव्वा उडविला. त्यांना केवळ चार जागावर विजय मिळवता आला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शुधांशू त्रिवेदी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. याचे पडसाद राज्यभरात पाहायला मिळाले. राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे गट याविरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
येथील पंताचा गोट परिसरात राहत्या घरी एकाला मारहाण केल्याबद्दल चौघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.