मलकापूर, ता. कराड येथून एकजण बेपत्ता झाल्याची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
जिल्ह्यातील किमान तापमानात उतार येत असून महाबळेश्वरचा पारा आणखी घसरला. सोमवारी तर १०.०४ अंशाची नोंद झाली. त्यातच थंडगार वारे वाहत असल्याने जिल्ह्यात हुडहुडी वाढली आहे. तर महाबळेश्वरातील सोमवारचे किमान तापमान यंदाच्या हंगामातील निचांकी ठरले आहे.
बहादुरवाडी ता वाळवा येथील नितीन मानसिंग दळवी वय २७ या युवकासह सहा युवकांना ३० लाखाला फसवणाऱ्या आकाश काशिनाथ डांगे (वय २३ रा. भाडळी बुद्रुक ता. फलटण) या तोतया नौदल अधिकाऱ्यावर शनिवारी रात्री उशिरा आष्टा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
विविध मागण्यांसाठी पुणे बंगळुर ग्रीन फिल्ड हायवे बाधित शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले .
सातारा येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना माफी वीर ठरवणाऱ्या सुधांशू त्रिवेदी भाजप राष्ट्रीय प्रवक्ता व महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा निषेध करण्यात आला. पोवई नाक्यावर शिवतीर्थ परिसरात काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून सुधांशू त्रिवेदी यांच्या प्रतिमेवर जोडे मारून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला.
वाहतुकीसाठी असणाऱ्या नियमांचे पालन केले जात नाही. सीट बेल्ट बांधणे, हेल्मेट वापरणे, बेगमर्यादेचे उल्लंघन करणे असे प्रकार अद्याप सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे अपर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांनी केले.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांबाबत जे वादग्रस्त विधान केले, त्याचा आम आदमी पार्टीच्यावतीने सातारा शहरातील शिवतीर्थावर निषेध नोंदविण्यात आला. तसेच कोश्यारी यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
एकाला मारहाण, शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सुऱ्याने वार केल्या प्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
इंदोली येथे मध्यरात्री ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला अज्ञातांनी आग लावली. यामध्ये नवा कोरा ट्रॅक्टर जळून खाक झालाय. दरम्यान ही आग कोणी लावली याबाबत उलटसुलट चर्चा सुरुवात झालीय. ऊस दर प्रश्नांवर शेतकरी संघटनांनी गनिमी कावा सुरू केल्याच शेतकऱ्यांमधून बोललं जात आहे.