रेठरे बुद्रुक ता. कराड येथे वसुलीसाठी गेलेल्या वीज कर्मचाऱ्याला तिघांनी मारहाण केली. सोमवारी 27 रोजी ही घटना घडली. याप्रकरणी तिघांवर कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील छत्रपती संभाजी महाराज मार्केटमध्ये गेल्या काही महिन्यापासून पारध्यांनी तळ ठोकला होता. तसेच त्यापरिसरात यांनी प्रचंड कचरा आणि घाण केली होती. त्यामुळे नागरिक, शेतकरी, व्यापाऱ्यांना त्रास होत असल्याने त्यांनी याबाबत नगरपालिकेकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत पालिकेने छत्रपती संभाजी मार्केट परिसराची स्वच्छता केली. तसेच त्याठिकाणी तळ ठोकून बसलेल्या पारध्यांनाही पोलिसांच्या मदतीने हूसकावून लावले आहे.
बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आझाद मैदान (मुंबई) येथे गुरुवार 23 डिसेंबर रोजी शेतकऱ्यांची गारानी मांडण्यासाठी आंदोलन करण्यात आले. त्याठिकाणी दिवसभर थांबूनही सरकारने शेतकऱ्यांचे गाराने ऐकले नाही. त्यामुळे राज्यातील आघाडी सरकारच्या निषेधार्थ बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने १ जानेवारी २०२२ हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
शहरातील दत्त चौक परिसरात एका युवकावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या भांडणाचा राग मनात शनिवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये संबंधित युवक जखमी झाला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
दुचाकी अपघातांमध्ये हेल्मेट नसल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा, यासाठी कराड शहर वाहतूक शाखेच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोजिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गांधीगिरी पद्धतीने हेल्मेट जनजागृती मोहीम राबवण्यात आली.
शासनाने बैलगाडा शर्यतीवर बंदी आणल्यानंतर अनेक शेतकरी कुटुंबांवर मोठे आर्थिक संकट ओढवले. परंतु, शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी सैदापूर येथील धनाजी शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांनी शासनाकडे सातत्याने प्रयत्न केले आहेत. न्यायालयाने नुकतीच बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवत शर्यतीस परवानगी दिली आहे. त्यामुळे या लढ्यात शिंदे कुटुंबियांचे महत्वाचे योगदान असल्याचे गौरोवोद्गार माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी काढले.
गत पावसाळ्यासह त्याआधी एकदोनदा आलेल्या महापुराचा नेरळेला मोठा फटका बसला. त्यामध्ये अनेकांच्या घरांसह शेती आणि जनावरांचेही नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी भरीव निधीची तरतूद केली आहे. त्याव्दारे लवकरच नदीकाठी संरक्षक भिंत आणि घाट तयार होऊन ग्रामस्थांसाठी सुरक्षितता निर्माण होईल, असे प्रतिपादन यशराज देसाई यांनी केले.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कृष्णा अभिमत विद्यापीठ आणि कृष्णा हॉस्पिटलने कोरोनाग्रस्त रुग्णांची आपल्या परिवाराप्रमाणे काळजी घेतली. आजपर्यंत सुमारे ८००० हून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार करणाऱ्या कृष्णा हॉस्पिटलचे कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी काढले.
सध्याच्या परिस्थितीत राजकरण हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून सर्व प्रश्नांची उत्तरे राजकारणातच आहेत. त्यामूळे दलित-बहुजनांनी उदासिनता झटकून राजकारणात सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी केले.
येथील आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा 'कराड गौरव पुरस्कार वितरण समारंभ व मुकुंद कुलकर्णी यांनी लिहिलेल्या आत्मकथनपर 'रंगपट' या ग्रंथाचे प्रकाशन असा संयुक्तिक सोहळा गुरुवारी 30 रोजी येथील सौ. वेणूताई चव्हाण स्मारक सभागृह येथे संपन्न होणार आहे.