2023- 2024 साठीच्या सादर झालेल्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी रेल्वेच्या माध्यमातून महाराष्ट्रासाठी विक्रमी तरतूद केली आहे. यापूर्वीच्या सन 2009 ते 2014 दरम्यान महाराष्ट्राला फक्त 1171 कोटींची तरतूद केली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस 8 फेब्रुवारी रोजी विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचे कट्टर समर्थक अशोका कंस्ट्रक्शन चे प्रोप्रायटर संजय मोरे व सातारा केमिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचे निधन झाले आहे. परवेज मुशर्रफ हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर दुबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते.
एकास मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
क्लासमध्ये कोयता आणणाऱ्या त्या सहा विद्यार्थ्यांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
युवकाचे अपहरण करून त्याचा खून केलेले तीन संशयित त्यामधील एक विधी संघर्ष बालक यांना स्थानिक गुन्हे शाखा आणि भुईंज पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्त कारवाई करत रत्नागिरी येथून जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.
पतीचे असलेले विवाहबाह्य संबंध आणि त्याच्यावर असलेल्या प्रेमातून पोलिसी सेवेत असलेल्या पत्नीने पतीच्या हत्येची सुपारी सराईत गुन्हेगारांना दिली. खुनाच्या या गुन्ह्यातील संशयितांना गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
भाषेमधून देशाच्या संस्कृतीचेही दर्शन घडते. अनुवादित साहित्य आणि भाषेचे सौंदर्य वाढले आहे व मराठी भाषा अधिक समृद्ध झाली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अनुवादित साहित्याच्या अभ्यासक डॉक्टर नीला जोशी यांनी केले.
माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळी मतदारसंघातून निवडून येण्याचे दिलेले आव्हान हे केवळ हास्यस्पद आहे. त्यांची खूपच तयारी असेल तर त्यांनी पाटण मतदारसंघातून येऊन निवडून दाखवावे, असे खुले आव्हान आमदार शंभूराज यांनी दिले.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी तातडीने अर्थमंत्री निर्मला सीतारामन व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन या बजेटच्या पुरवणी मागणीमध्ये फलटण-बारामती जे रेल्वे कामासाठी 100 कोटी व फलटण पंढरपूर साठी २० कोटी तरतूद बजेटमध्ये करावी, अशी मागणी केली. त्याची दखल घेऊन वित्त मंत्री निर्मला सीताराम यांनी बजेटमध्ये 120 कोटी रुपयांची तरतूद केली.