कराडवाडी, ता. खंडाळा गावच्या हद्दीत अज्ञात महिलेचा कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आल्याची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
शिंगणापुर, ता. माण येथे जावयाने त्यांच्या सासऱ्याच्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रातील कोअर झोनमधील मौजे वेळे ता.जावली जि. सातारा या गावचे पुनर्वसन होणार हे निश्चित आहे. तरी वेळे गावातील संबंधितांनी पुनर्वसनकामी उपवनसंरक्षक (प्रा) सातारा या कार्यालयास त्वरीत संपर्क साधावा. वेळेत संपर्क न साधल्यास, पुनर्वसन प्रक्रियेस विलंब झाल्यास त्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही, असे प्रकल्प अधिकारी तथा उपवन संरक्षक एम. एन. मोहिते यांनी कळविले आहे.
पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे वाटोळे राजकारणातील प्रस्थापित नेतृत्वांने केले आहे राजकारणाच्या पलीकडे जाऊन कारखान्याला आर्थिक गर्तेतून बाहेर कसे काढावे याचे याची फेरमांडणी झाली पाहिजे शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करेल त्या त्याला आमचा पाठिंबा असेल वेळप्रसंगी शेतकऱ्यांची ताकद उभी करून आम्ही स्वतः तिसरे पॅनेल उभे करू असे प्रतिपादन बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.
ठिबकचा कॉक का फिरवला. या कारणावरुन खंडोबाचीवाडी येथे दि. ९ एप्रिल रोजी मारहाणीची घटना घडली. याप्रकरणी मिनाक्षी नीलेश शिंदे रा. खंडोबाचीवाडी यांनी तक्रार दिल्यानंतर सातारा तालुका पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.
साताऱ्यातील शनिवार पेठ येथे असलेल्या वाघाच्या नळी परिसरामध्ये किरकोळ वादातून मल्हारपेठ येथे राहणाऱ्या रोहित सोनटक्के या तरुणावर करंजातील एका तरुणाने जमावाच्या मदतीने कोयत्याने हातावर वार करून त्याला गंभीर जखमी केला आहे. याबद्दलची तक्रार रोहित सोनटक्के याने साताऱ्यातील शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे.
कोडोली, ता. सातारा गावच्या हद्दीत एकाला तीन जणांनी धक्काबुक्की करून मारहाण केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
राज्यातील महसूल विभागात कारकून पदे तत्काळ भरावीत तसेच नायब तहसीलदारांच्या बाबतीत नवीन काढलेला आदेश शासनाने रद्द करावा, या प्रमुख मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
डिजिटल सभासद नोंदणीमुळे गाव व खेड्यातील काँग्रेसचा कार्यकर्ता पुन्हा सक्रिय झाला असून सातारा जिल्ह्यात काँग्रेस पक्ष आणखी मजबूत होईल, असा आशावाद महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.
मार्केटमध्ये कैरीचं पन्हं सहजतेने उपलब्ध असतं, पण तुम्ही हे पन्ह घरच्या घरी देखील बनवू शकता. उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. घराबाहेर पडल्यावर उन्हाच्या झळा जाणवू लागतात. अशा दिवसांत आपल्या सर्वांचा कल थंड पेय पिण्याकडे असतो. मात्र थंड कोल्डड्रिंक पिण्यापेक्षा कैरीचं पन्ह हा एक उत्तम पर्याय आहे. कैरीच्या पन्ह्याचं सेवन उन्हाळ्याच्या दिवसांत खूप फायदेशीर मानलं जातं.