बहिणीचे फोटो का काढतोस? असा जाब विचारत एकाला सातारा बसस्थानक परिसरात सहाजणांनी मारहाण केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
मालगाव, ता. सातारा येथे एकाला मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा- कोरेगाव मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाल्याची घटना घडली.
भाटनिमगाव (ता. इंदापूर) येथील पशुवैद्यकीय अधिकारी साताराकडे जात असताना शुक्रवारी (दि ८) लोणंद-सातारा महामार्गावरील अंबवडे चौकाजवळ ट्रक-दुचाकी अपघातात ठार झाले. श्रीकांत रवींद्र शिंदे असे मृत पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे.
गत दोन दिवसांपासून राज्यभरात उष्णतेची लाट आली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रचंड तापमानामुळे नागरिक हैराण असून देशात विदर्भ सर्वाधिक उष्ण ठरला आहे. विदर्भात सूर्य तपळण्यास सुरूवात झाली आहे. मंगळवारी चंद्रपूर (43.4 अंश) जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक उष्ण शहर ठरले.
45 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेची मानाची गदा कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील याने अत्यंत दिमाखात शनिवारी रात्री झालेल्या अंतिम फेरीमध्ये पटकावली. त्याने लढतीमध्ये पाच विरुद्ध चार गुणांनी मुंबईच्या विशाल बनकर यांचा शेवटच्या दीड मिनिटांमध्ये दुहेरी पट काढून पराभव केला. यानंतर पृथ्वीराज समर्थकांनी त्याला उचलून घेत आखाड्यामध्ये एकच जल्लोष केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याचा सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला.
19 वर्षांच्या पृथ्वीराज पाटील यांनी जिंकला महाराष्ट्र केसरीचा किताब. पृथ्वीराज पाटील यांना 2022 चा किताब मिळाला आहे. गादी विभागात अंतिम फेरीमध्ये पृथ्वीराज पाटीलने हर्षद कोकटेचा पराभव केला होता. विशाल बनकर विरुद्ध पृथ्वीराज पाटील असा अंतिम लढत झाली. यात पृथ्वीराज पाटीलने विशाल बनकर यांचा पराभव केला आहे.
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा गावच्या हद्दीत कणसे ढाब्यासमोर दुचाकी चालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या प्रकरणी कंटेनर चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात असणार्या काही गावांत गुरूवारी रात्री एकाच वेळी 21 बंद घराच्या घरफोडी करून रोख रक्कम, सोने आदी साहित्य लंपास केले असल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेत जावळी तालुक्यातील करंजे, सावली, आसणी, भोगवली, पुनवडी, केडंबे, वाळंजवाडी आणि वरोशी या पाच गावातील एकूण 21 बंद घरे फोडली असल्याचे उघडकीस आले आहे.