येथील शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी १८ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेल्याची तक्रार शाहुपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
सासपडे, ता. सातारा येथे एका महिलेस मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पत्नीला आणण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे साताऱ्या वरून गेलेल्या युवकाला सासरा आणि मेव्हण्याने बेदम मारहाण केली.
फलटण, ता. फलटण येथील बारामती पुलानजीक भेसळयुक्त डांबर व ऑईलची वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकावर फलटण शहर पोलीस ठाण्यातील पथकाने धडक कारवाई करून ३४ बॅरलसह ३५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याने खंडाळा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
ओबीसी समाजाच्या आरक्षणासंदर्भात सातारा जिल्हा ओबीसी संघटनेने येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बाहेर धरणे आंदोलन करून सातारा जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन पाठवले.
कॉलनी फिल्म्स निर्मित व मूळचे वाईचे असणारे लेखक दिग्दर्शक निर्माता गणेश चव्हाण यांचा पहिलाच जिव्हारी नावाचा चित्रपट 20 मे रोजी येथील राजलक्ष्मी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याची माहिती चव्हाण यांनी साताऱ्यात पत्रकार परिषदेत दिली.
खा. शरद पवार यांच्या विषयी आक्षेपार्ह सोशल मिडीयावर पोस्ट केल्याप्रकरणी सिने अभिनेत्री केतकी चितळे हिच्यावर महाराष्ट्रात खळबळ उडाली असतानाच आता तिच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात याच प्रकरणावरुन एफआयआर’ दाखल झाला आहे.
बसस्थानकाशेजारील सेवन स्टार इमारतीमध्ये असलेल्या मोबाईल शॉपीमध्ये घुसून व्यंकटेश सुभाष त्रिंबके (वय 22, रा. गडकर आळी, सातारा) या तरुणाच्या गळ्यावर ब्लेडने वार करण्यात आले. त्यानंतर संबंधिताने दुकानातील साहित्याची तोडफोड केली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल केला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने यावेळी स्वतः सातारा जिल्ह्यातील नऊ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभागरचना अंतिम केल्या आहेत. या प्रभाग रचनेमध्ये गट पंचवार्षिक निवडणुकीत नोंदवले गेलेले प्रगणक गट यंदाच्या प्रभाग रचनेच्या नकाशातून गायब झाल्याने आपल्या वॉर्डात नक्की किती मतदान असणार, याविषयी इच्छुक उमेदवारांना संभ्रमावस्था निर्माण होणार आहे. त्यामुळे या मुद्द्यावर हरकत नोंदवली जाणार असल्याची चिन्हे आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार सातारा पालिकेच्या आगामी निवडणूकीसाठी जाहीर केलेल्या प्रभाग रचनेवर २९ हरकती दाखल झाल्या आहेत. या हरकतींवरील सुनावणी ता. २३ पर्यंत होणार असून त्यानंतर त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोगास सादर करण्यात येणार आहे.