मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती आणि ऐतिहासिक शाहूनगरी चे संस्थापक छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सातारा शहरातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली होती, या मिरवणुकीचे आयोजन शाहूनगरी फाउंडेशनच्या संस्थापक वृषालीराजे भोसले यांच्या वतीने करण्यात आले होते. या पालखी सोहळ्यामध्ये सातारकर मंडळी उत्स्फूर्तपणे सहभागी झाली होती.
सातारा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा प्राथमिक कार्यक्रम सुरू झाला आहे. सातारा जिल्ह्यातील नऊ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभागरचनांवर हरकतींचा कार्यक्रम जाहीर झाला असून मंगळवारी संपलेल्या मुदतीपर्यंत जिल्ह्यातून एकूण 59 हरकती नगरपरिषद संकलन कक्षाकडे दाखल झाल्या आहेत. या हरकतींवर दिनांक 19 व 20 रोजी सुनावणी होणार आहे.
सातारा शहरासह विस्तारित भागातील नागरिकांना सोयी-सुविधा देण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून शासनाने ४८ कोटी रुपये मंजूर केले. पैकी २५ कोटींचा निधी पालिकेकडे आला असून मे अखेर आणि २३ कोटी रुपये जमा होतील. शहराच्या पूर्वेला असणाऱ्या विलासपूर भागाच्या पायाभूत सुविधांसाठी बारा कोटी रूपये दिले जाणार आहेत, अशी माहिती येथील युवा उद्योजक संग्राम बर्गे यांनी दिली.
सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे आमदार जयकुमार गोरे यांना बुधवारी त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात दिलासा मिळाला आहे. आमदार गोरेंनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. त्यामुळे त्यांच्यावरील अटकेची कारवाई टळली आहे.
सातारा-म्हसवड रस्त्यावर गोंदवले खुर्दनजीक स्वीफ्ट कार आणि पल्सर दुचाकीच्या भीषण अपघातात पानवण, ता. माण येथील युवक ठार झाला. उमाजी आप्पा नरळे असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. या अपघातात दुचाकीवरील अजित नरळे गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी सातारा येथे हलविण्यात आले आहे.
मॅप्रो फूड स कंपनीत ४१ लाख रुपये किंमतीच्या डाय व यांत्रिक मोटारी चोरणाऱ्या वाई शहरातील दोघांना वाई पोलिसांनी शहर परिसरातून अटक केली. गौरव गुळुंबकर व जय घाडगे अशी अटक केलेल्यांची नावे असून त्यांनी चोरलेला मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा शाबीत झाल्याने विकास दत्तात्रय जाधव वय 28 राहणार निसराळे तालुका जिल्हा सातारा याला सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. तिसरे तदर्थ जिल्हा न्यायाधीश आर. के. राजेभोसले यांनी हे आदेश दिले.
दुष्काळी तालुक्यांना वरदान ठरणार्या जिहे - कठापूर योजनेसाठी मी जलसंपदामंत्री असताना 134 कोटी मंजुर केले. नेर तलाव्यात पाणी आले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वेळोवेळी ग्राहकाभिमुख योजना राबवत असते. या योजनाना ग्राहक खातेदारांचा कायमच चांगला प्रतिसाद मिळत आलेला आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये प्रत्येकाला विमा संरक्षण असणे गरजेचे आहे. त्यात प्रामुख्याने घरातील कमावती आणि जबाबदार व्यक्ती विमा संरक्षित असणे महत्वाचे आहे.
किसन वीर सहकारी कारखान्याच्या अध्यक्षपदी आमदार मकरंद लक्ष्मणराव पाटील यांची तर उपाध्यक्षपदी प्रमोद भानुदास शिंदे यांची निवड करण्यात आली. कारखान्याच्या निवडणुकीत 19 वर्षांनंतर सत्ता परिवर्तन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील किसन वीर कारखाना बचाव शेतकरी पॅनेलने सर्व 21 जागा जिंकत सत्ता काबीज केली होती.