येथील दौलत नगर परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार शाहुपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
वाई ते पाचगणी जाणाऱ्या मार्गावर पोलीस हवालदार कर्तव्य बजावत असताना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तीन महिलांवर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात चार वेगवेगळ्या ठिकाणावरुन चौघे बेपत्ता झाल्याच्या तक्रारी विविध पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.
केंद्र सरकारने दोन वेळा इंधनाच्या अबकारी करांमध्ये कपात केली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. राज्य सरकारने व्हॅट मध्ये कपात केली आहे. अद्याप याचा फायदा नागरिकांना मिळाला नसला तरी केंद्राच्या दरकपात विरोधात पेट्रोल पंप चालकांची संघटना फामपेडा आक्रमक झाली आहे.
पेट्रोलचे दर कमी झाल्याने वाहनचालक खुश असले तरी खटाव तालुक्यातील काही पेट्रोल पंपावरील पेट्रोल संपल्याने सध्या पेट्रोल नसल्याचे फलक काही ठिकाणी लागले आहेत. तर वडूज येथील पेट्रोल पंपावर वाहनांची गर्दी दिसून येत आहे.
शिवसैनिकांनी आपापसात कोणतेही हेवेदावे न ठेवता चांगल्या कामांना परिणाम द्यावेत काम करूया आणि कामाचे रिझल्ट येऊ द्या, असे आवाहन कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार आणि शिवसंपर्क अभियानाचे प्रमुख खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले.
विसापूर ता. खटाव येथील सुभेदार विजय सर्जेराव शिंदे हे लेह लडाख येथे देशसेवा बजावत होते. भारतीय लष्कराचे वाहन श्योक नदीत अपघातग्रस्त झाले. या अपघातात त्यांना वीरमरण आले. त्यांच्या वीरगतीमुळे गेली दोन दिवस विसापूरसह संपूर्ण खटाव तालुका शोकसागरात बुडाला आहे.
माझ्यावर जे राजकीय आकसातून गुन्हे दाखल झाले त्याच्या पाठीमागे संपूर्ण राष्ट्रवादी आहे. मायणी मेडिकल कॉलेजचे विश्वस्त एम. आर. देशमुख हे निमित्त आहे. पण आमदार गोरे कोणाला घाबरणारा आमदार नाही. राष्ट्रवादी च्या राजकीय षडयंत्राला जशास तसे प्रत्युत्तर देणार, असा दमदार घणाघात आमदार जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत केला
वडीलोपार्जीत शेतातील जमीन कसण्यासाठी जाताना वाट अडविली. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात चिखली ता. सातारा येथील दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘पुन्हा कॉलेजला आलीस तर मी तुला जिवंत ठेवणार नाही,’ अशी धमकी दिल्यामुळे संबंधित तरूणीने सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन संबंधित युवकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.