सातारा जिल्ह्यात सहा वेगवेगळ्या ठिकाणी सूरु असणाऱ्या दारू अड्डयावर पोलिसांनी छापे टाकुन १३ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
परळी, ता. सातारा गावच्या हद्दीत सुरू असणाऱ्या जुगार अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी ३३, हजार ८८० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.
सातारा जिल्ह्यातून तीन वेगवेगळ्या ठिकाणाहून तीन जणी बेपत्ता झाल्याची तक्रार संबंधित पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व सईबाई राणीसाहेब यांची नात व छत्रपती संभाजीराजे व येसूबाई राणीसाहेब यांच्या जेष्ठ कन्या भवानीबाई राजेमहाडिक यांच्या समाधी जीर्णेाध्दारास शाहुनगरी फाऊंडेशनच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही फाऊंडेशनच्या संस्थापिका वृषाली राजे भोसले यांनी दिली.
जळणाचे बीडे ठेवण्याच्या कारणातून एका कुटुंबाने दुसऱ्या कुटुंबावर हल्ला केला. ही घटना क्षेत्रमाहुली ता. सातारा येथे दि. २६ रोजी घडली. या प्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी सागर भोगावकर यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
क्षेत्रमाहुली, ता. सातारा येथे गर्दी करून मारहाण केल्याप्रकरणी सहाजणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
मोबाईलमध्ये रमलेल्या मुलांना मैदानाची गोडी लागावी याकरिता माजी नगराध्यक्षा स्मिताताई घोडके यांच्या वतीने आयोजित उन्हाळी शिबिराला यंदा उत्तम प्रतिसाद मिळाला. सात ते पंधरा वयोगटातील सुमारे अडीचशे मुलांनी या शिबिरात भाग घेतला होता. कराटे प्रशिक्षणासह हस्तकला, चित्रकला विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
साताऱ्याचे प्रसिद्ध निसर्ग संशोधक व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री मुंबई येथे सक्रिय असणारे हर्षल भोसले यांनी चाळकेवाडी पठारावर नवीन वनस्पतीच्या प्रजातीची नोंद करण्यात यश मिळवले आहे. लेपिडोगॅथस म्हणजेच महा कश्यपी अशी या वनस्पतीची नोंद करण्यात आली असून ही वनस्पती अकँथेसी या कारवीच्या कुळातील आहे. या नवीन संशोधनामुळे पश्चिम घाटातील जैवविविधतेच्या विपुलतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
अदालत वाडा परिसरातील शनिवार पेठेत खळग्या मारुती समोर असणाऱ्या देवधर वाड्याला मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता भीषण आग लागून या वाड्याचे मोठे नुकसान झाले. या आगीमध्ये इलेक्ट्रिक साहित्य तसेच संसारोपयोगी साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. सुदैवाने या आगीमध्ये जीवित हानी झाली नाही. मात्र या वाड्यात राहणाऱ्या देवधर कुटुंबियांचे मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.