नवीन एमआयडीसी, सातारा परिसरातील खासगी मराठी शाळेच्या आवारात असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये दि.१ रोजी किशोर शंकर चव्हाण रा. लांजा, ता. चिपळुण, जि. रत्नागिरी यांचा मृतदेह आढळुन आला.
कटगुण (ता. खटाव) येथील किशोर प्रल्हादराव विधाते यांच्या फार्महाऊसवर त्यांची आई श्रीमती सुमन प्रल्हादराव विधाते यांचा खून करणाऱ्या मध्यप्रदेशातील सुनीलकुमार गणपत गौड (वय ३०) याला वडूज येथील जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
शिरगाव तालुका वाई गावच्या हद्दीत विजेचा शॉक बसून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे शिरगाववर शोककळा पसरली आहे. या घटनेतून तीन मुले सुदैवाने बचावली आहेत.
कोल्हापूर येथील देवीचे दर्शन घेऊन पुण्याकडे निघालेल्या कार चालकाला उलटी व मळमळल्यागत होत असल्याने, त्याने कार महामार्गालगत बाजूला घेतली. त्याचवेळी खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील पंढरपूर फाटा याठिकाणी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने कारला जोरदार धडक दिल्याने एकाचा मृत्यू, तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहे.
औद्योगिक क्षेत्रातील कामगार-कर्मचारी व नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘मास मॅरेथॉन-2022’चे आयोजन करण्यात आले होते. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या मॅरेथॉनचा शुभारंभ करण्यात आला. ही मॅरेथॉन महाराष्ट्रातील माईल स्टोन ठरेल, असे गौरवोद्गार जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी काढले.
कोरेगाव व माण विधानसभा मतदारसंघ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम उभा असून दोन्ही विधानसभा मतदारसंघातून बहुसंख्येने शिवसैनिक दसरा मेळव्याला शिवतीर्थावर उपस्थित राहणार आहेत, असे प्रतिपादन शिवसेनेचे नवनिर्वाचीत जिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांनी केले.
घरफोडी, चोरी प्रकरणी एका संशयित इसमाला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. त्याच्याकडून ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अभिषेक गणेश आवारे वय ३०, रा. गेंडामळ सातारा असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे.
तीन टक्के व्याजाने पैसे देऊन पैसे परत घेण्यास टाळाटाळ करून जमीन नावावर करून फसवणूक केल्याप्रकरणी लोणंद, ता. फलटण येथील दोघांवर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी दारु अड्डयावर छापा टाकून २ हजार ५२० रुपये किमतीची दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.
प्रत्येक गावाने ठरवले तर त्याचे स्मार्ट व्हिलेज मध्ये रूपांतर होऊ शकते. ग्राम विकासाची पंचसूत्री जर आपण राबवली तर आपले गाव निश्चित स्मार्ट होईल, असे पाटोदा (औरंगाबाद) येथील आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी निढळ ता खटाव येथील फ्रेंडस प्रतिष्ठान येथील दुर्गा उत्सवा निमित्ताने झालेल्या विशेष व्याख्यानामध्ये सांगितले.