धनत्रयोदशी दिवस साजरा करण्यामागे काही कथा सांगितल्या जातात… ज्यावेळी इंद्रदेवाने असुरासमवेत समुद्रमंथन केले त्यावेळी त्यातुन देवी लक्ष्मी प्रकट झाली त्यानंतर सागरातुन अमृतकुंभ घेउन धन्वंतरी प्रकटले म्हणुन या धनत्रयोदशीला धन्वंतरीची पुजा करण्याची पध्दत आहे. या दिवसाला “धन्वंतरी जयंती” (Dhanvantari Jayanti) असेही म्हंटले जाते.
पाण्यात बुडून एकाचा मृत्यू झाल्याची नोंद शिरवळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तिघांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा शहर परिसरातून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन दुचाकींची चोरी झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी कार चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस चालू झाला असताना झाडाखाली स्टाॅलच्या समोर व आडोश्याला थांबलेल्या घोड्यांवर वीज पडून तीन घोडी जागीच ठार झाल्याची घटना गुरुवार (दि.२०) रोजी पाचगणी टेबल लॅंन्ड पठारावर दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. घोडे व्यावसायिक झाडापासून दूर असल्याने बचावले.
गडचिरोलीचे अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख यांची पदोन्नतीने साताऱ्यात पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. यापूर्वी सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून शेख यांनी धडक कामगिरी बजावली होती. पुन्हा एकदा साताऱ्याच्या होम ग्राउंड वर शेख यांची बदली झाली असून त्यांच्या बदलीचे साताऱ्यात स्वागत होत आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये कोरेगाव, खंडाळा, महाबळेश्वर, खटाव, कराड या पाच तालुक्यांच्या 77 गावांमध्ये 600 हेक्टर वरील पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य शासनाने हेक्टरी 75 हजार रुपये अनुदान जाहीर करून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव यांनी केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला शंभर रुपयांमध्ये एक किलो पामतेल, एक किलो साखर, एक किलो रवा आणि एक किलो डाळ असा शिधा संच 100 रुपयात देण्याची योजना जाहीर केली होती.