माझ्यावर प्रेम करणारे भरपूर लोक आहेत. त्यातील काही महान व्यक्तींनी पेटींगबाबत इच्छा व्यक्त केली. बघू त्यांच्या इच्छेचे. लोक तुमच्यावर पण प्रेम करतील तेव्हा तुमचेही पेंटींग लावतील, अशा खोचक शब्दात आमदार शिवेंद्रराजे यांचे नाव न घेता त्यांच्यावर खासदार उदयनराजेंनी टीका केली.
करंजे येथे अज्ञाताने कडी-कोयंडा तोडून घरफोडीचा प्रयत्न केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
देगाव ता. सातारा येथे दारु विक्री प्रकरणी महेश नारायण सुर्यवंशी वय ४१, रा. देगाव याच्या विरुध्द सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सोनगाव तर्फ सातारा येथील सुवर्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत चेअरमनसह एकूण 16 जणांनी 67 लाख 51 हजार 910 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील वनवासमाची येथील निर्जनस्थळी महिलेचा खून झाल्याची घटना बुधवार रोजी उघडकीस आली आहे.
सातारा जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 17 वा वर्धापनदिन होणार जल्लोषात साजरा होणार असून यादिवशी विविध उपक्रमांचे मनसे पदाधिकारी- कार्यकर्त्यांनी आयोजन केले असल्याची माहिती मनसे चे जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांनी दिली. दरम्यान, याच दिवशी गरजूंना खाद्यपदार्थांचे वाटपही करण्यात येणार आहे.
राधिका रस्त्यावर सुरू असलेला ‘ओपन बार’ पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून बुधवारी ‘क्लोज’ करण्यात आला. उशिरा का होईना पालिकेने मद्यपींचा अड्डा बनलेल्या येथील हातगाड्यांवर धडक कारवाई केल्याने नागरिकांमधूनही समाधान व्यक्त करण्यात आले.
महिलांचे संघटन अधिक मजबूत करुन काँग्रेसची विचारधारा जिल्ह्यात आणखी गतीमान करण्याचे काम माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे सकारात्मक उर्जा मिळाली आहे.
महिला जोपर्यंत आर्थिक दृष्ट्या सक्षम होत नाही तोपर्यंत सक्षमीकरण होऊ शकत नाही. महिलांमध्ये आव्हानांचा सामना करण्याची ताकद निश्चित आहे. महिलांना तुम्ही देवी म्हणण्यापेक्षा त्यांना माणूस म्हणून जगण्याचा आणि स्वातंत्र्याचा अधिकार द्या, असे प्रतिपादन भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी केले.
नागठाणे येथील गट नंबर 702 या सरकारी जागेवरील 14 कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्याविषयी शासन निर्देश असतानाही अद्याप त्यांना घरकुले मिळाली नाहीत, याबाबतच्या मागणीसाठी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आमरण उपोषण सुरू करण्यात आले.