संशयीत रवि कुडवे याचा दाजी नितीन नागेश भालशंकर (वय २१) रा. वैराग, सध्या रा. वाखाण परिसर, कराड हा त्याच्या पत्नीला व रविच्या बहिणीला दारु पिवून वारंवार मारहाण करत होता. त्याबाबत रवि त्याला समजावून सांगत असताना दोघांत वाद झाला. या वादात रविने गळा दाबून दाजी नितीनला बेशुध्द केले व त्यानंतर शेजारचा दगड उचलून त्याच्या छातीवर मारला.
ही वृद्धा तांबवेतून उत्तर तांबवेकडे जाणाऱ्या रस्त्यावर पायी निघाली असताना तिला मारहाण करत असल्याचा हावभाव चोरट्यांनी हात साफ केले. गौरी-गणपतीच्या सणावेळी २५ ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेबाबत शालन शामराव शिंदे रा. तांबवे यांनी शनिवारी ३० रोजी कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मालखेड (नवे) ता. कराड तीन ठिकाणी घरफोड्या झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी २९ रोजीच्या मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये एका घरातील ६२ हजार ४०० रुपये किंमतीचे अडीच तोळ्याचे सोन्याचे दागिने कर्त्यांनी लंपास केले आहेत.
एका महिलेने औषधाच्या अतिरिक्त गोळ्या खाल्ल्याची घटना सारखळ, ता. सातारा येथे घडली.
मायणी, ता. खटाव येथे एका महिलेने विषारी औषध प्राशन केल्याची घटना घडली.
जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाल्याची घटना घडली.
सातारा : सातारा व कराड तालुक्यात मटका जुगार जबरी चोरी आणि खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोन टोळीतील सहाजणांना एक वर्षासाठी सातारा जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी हे आदेश दिले.सातारा शहर व तालुक्यात मटका अड्डा चालविणे, जबरी चोरी करणे यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये हवे असणारी समीर सलीम कच्छी (वय ३९, रा. मोळाचा ओढा), अक्षय अनिल तळेकर (रा....
फटाक्यातील कार्बन आणि सल्फर हे विषारी वायूंची क्षेणी तयार करतात. मात्र, ते वनस्पती आणि प्राण्यांसाठी हानिकारक असल्याने मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी शहरात फटाके उडविण्यास प्रतिबंध घालले आहेत.
सातारा जिल्ह्याला सह्याद्रीने वेढले आहे. याबाबत प्रत्येकाचा उर भरुन येतो. सातारा तालुक्यातही अनेक ठिकाणी सह्याद्रीच्या रांगा पाहायला मिळतात. आपल्या तालुक्याला जल, जमीन आणि जंगल ही त्रिवेणी संगम असणारी पर्वणी लाभली आहे. हा त्रिवेणी संगम आपल्याला ऊर्जा देऊन जातो.
उदयनराजेंचे सल्लागार त्यांना चुकीचा सल्ला देत आहेत. बँकेचे कामकाज अत्यंत उत्तमरित्या सुरू असून संपूर्ण भारतात ही बँक नावाजलेली आहे त्यामुळे काहीही बोलून बँकेची बदनामी करणे थांबवावे. जरंडेश्वर कारखान्याला कर्ज देताना घेण्यात आलेले आहे. कारखान्याला दिलेले कर्ज हे नियमित परतफेड केले जात आहे. बँकेचे ऑडिट नाबार्डच्या माध्यमातून वेळोवेळी होत असते बँकेत जर चुकीचे काही घडले असते तर बँकेचे कौतुक देशभर झाले नसते.