आल्याचा चहा हे एक उत्तम पेय आहे. त्याचे अनेक आरोग्यासाठी फायदेही आहेत. आल्यामध्ये व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम आणि इतर खनिजे भरपूर प्रमाणात असतात. जी तुमच्या आरोग्यासाठी चांगल्या प्रकारे काम करतात. आले हे अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्मांचे पॉवरहाऊस आहे. जे तुमच्या त्वचा, केस आणि शरीरासाठी फायदेशीर आहे.
वर्धनगड घाटातील रामोशी वाडी कडून दोन नंबर पुलाचे काम गेली चार महिने पूर्ण होऊन देखील त्या पुलाच्या रस्त्याचे काम अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे. पुलाच्या बाजूने काढून दिलेला रस्ता पूर्णपणे खडतर झाला असून आणि चढ उताराचा असल्याने या ठिकाणी उसाचे ट्रॅक्टर-ट्रॉली चढण्यासाठी किंवा उतरण्यासाठी मोठी ताकद लागत असल्याने त्या रस्त्यावरच बंद पडतात!
सातारची माती ही कसदार आहे. या मातीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या इवल्या इवल्या पावलांचे ठसे उमटले आणि याच मातीतून त्यांनी प्रज्ञेच्या, विद्वत्तेच्या वैश्विक नभांगणात उंच भरारी घेतली. ते इतके उंच गेले की त्यांच्या कार्यकर्तृत्वाने अवघ्या जगाचे डोळे दीपले.
सरकार व कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या उसाला एकरकमी एफआरपी व अधिक सहाशे रुपये जादा दर जाहीर करावा. या मागणीसाठी रविवारी दि. 7 नोव्हेंबर रोजी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पावन भूमीतून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसोबत येडेमच्छिंद्र ते कराड अशी पायी संघर्ष यात्रेला काढणार आहोत.
उपमुख्यमंत्री यांनी डिंसेबरमध्ये भरतीची घोषणा केली. परंतु दोन वर्षात भरती न झाल्याने वयाची मर्यादा हा विषय आहे, या पार्श्वभूमीवर लष्कराच्या विभागाने वयाच्या बाबतीत लेखी आश्वासन दिले आहे, मात्र त्याबाबत आदेश काढावा.
राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दिव्यांग बांधवांच्या पाच टक्के निधीबाबत यापूर्वी दि.3 ऑगस्ट रोजी कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना पत्र देण्यात आले होते, त्यावर कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी दि.13 ऑगस्ट रोजी चे पत्र आम्हाला देण्यात आले.
काल दि. 5 रोजी मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून सातारच्या कलावंतांनी एकत्र येऊन अत्यंत साध्यापणाने शाहूकला मंदिर येथे मराठी रंगभूमी दिन साजरा केला.
उंब्रजमध्ये शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलीस त्रास देणाऱ्या एका रोडरोमिओला पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. या रोडरोमिओची तक्रार मिळताच दोन तासात उंब्रज पोलिसांनी उचलबांगडी केली.
चोरट्यांनी याचीच संधी साधत अपार्टमेंटमधील तक्रारदार यांचा व प्रज्ञा भगवानराव सपाटे यांच्या घरी चोरी केली. ही घटना दि. 2 रोजी समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. तक्रारदार यांनी घरामध्ये पाहणी केली असता घरातील साहित्य अस्ताव्यस्त विखुरलेले होते.
दि. 13 ऑक्टोबर रोजी गुरुवार पेठेत चोरी झाल्याबाबतची तक्रार शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. अज्ञात चोरट्याने घरातून 1 लाख 80 हजार रुपये किंमतीचे राणीहार व सोन्याचे गंठण लंपास केल्याचे तक्रारीत म्हटले होते.