कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यामुळे दोन वर्षांत प्रथमच अत्यंत जल्लोषात शाहूनगरी ने रंगपंचमीचा आनंद घेतला. बालगोपाळांनी एकमेकांना यथेच्छ रंगात भिजवून काढत पर्यावरण पूरक रंगांच्या माध्यमातून रंगपंचमी साजरी केली. साताऱ्यात दिवसभर रंगपंचमीचा अनोखा उल्हास पाहायला मिळाला.
त्वचेवरचा रंग काढून टाकण्यासाठी लोक त्वचा स्क्रब करणं सुरू करतात. पण असं कधीच करू नये असं केल्यानं त्वचेचा रंग जाईल पण नुकसानही पोहोचू शकतं.
वडूथ, ता. सातारा येथील स्मशानभूमीलगत असणाऱ्या वेण्णा नदीपात्रात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सोमवारी आढळला. या मृतदेहाचे दोन्ही डोळे निकामी असल्याने घातपाताची शक्यता व्यक्त होवू लागली. दरम्यान, या घटनेने वडूथ व परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस स्टेशनचे पोलीसही दाखल होत त्यांनी अज्ञात मृतदेह बाहेर काढून पोस्टमार्टमसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला.
येथील सातारा पॉलिटेक्निक महाविद्यालयानजीक आज पहाटे रस्त्याकडेला एक ५ वर्षीय बालिका निपचित अवस्थेत आढळून आली. तिला तात्काळ येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने तिच्यावर प्रथम उपचार करून तिला पुढील उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता तिच्यावर अत्याचार झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातील सूत्रांनी दिली.
येथील शाहूपुरी परिसरात असणाऱ्या गेंडामाळ येथे रविवारी मध्यरात्री एकावर फायरिंग करून कोयत्याने वार केल्याची घटना घडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने फायरिंग झाले मात्र पिस्तूलमधून गोळी बाहेर न आल्याने अनर्थ टळला. याबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
खंडाळा येथील तुकाराम भिकू जाधव व प्रमिला तुकाराम जाधव या दांपत्याला त्यांचे शेजारी घराच्या जागे संदर्भातून वारंवार त्रास देत असल्याची तक्रार प्रमिला जाधव यांनी पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्याकडे केली आहे. प्रमिला जाधव यांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेऊन आपली व्यथा प्रसार माध्यमांसमोर मांडली.
अपहरण व खंडणी प्रकरणातील पाडळी, ता. सातारा येथील युवकाला बोरगाव पोलिसांनी केवळ चार तासात जेरबंद केले. शिवेंद्र राजेंद्र ढाणे असे त्याचे नाव आहे.
भाजपचे माणचे आक्रमक शैलीचे आमदार जयकुमार गोरे यांना भाजप जिल्हाध्यक्षपदावर नियुक्ती देण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत सोमवारी ही घोषणा केली. माजी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांना प्रदेश सचिव पदावर बढती झाली आहे.
भुईंज (ता वाई) येथील किसनवीर सहकारी साखर कारखानामधील कामगारांना २५ महिन्यांपासून पगार न मिळाल्याने त्यांनी कारखान्याच्या गेट समोर ठिय्या आंदोलन पुकारले. या आंदोलनात सुमारे ४०० पेक्षा अधिक कामगार सहभागी झाले.
विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदानासाठी डॉ. अनिलकुमार राजवंशी यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. तळागळातील शास्त्रज्ञ अशी डॉ. राजवंशी यांची ओळख आहे. निंबकर कृषि संशोधन संस्था (नारी) चे ते संचालक आहेत. डॉ. राजवंशी यांनी अक्षय ऊर्जा संशोधन, ग्रामीण आणि सतत विकास याविषयांवर त्यांचा तीस वर्षापेक्षा अधिक अभ्यास आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आले.