शाश्वत विकासाच्या नऊ सुत्रावर आधारित ग्रामपंचायत विकास आराखड्याच्या माध्यमातून शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करावीत, असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केले.
जमिनीवर पाय असणारी आमची नगरसेवक पदापासून सुरू झालेली कारकीर्द आणि आपल्याला मिळालेली थेट आमदारकी हाच आपल्यामधील मूलभूत फरक आहे हे आम्ही बोलून दाखवले होते. केलेले आव्हान स्वीकारण्याऐवजी पालायन करायचे आणि पुन्हा बिनपुराव्याचे आरोप करायचे आणि आपलीच पाठ थोपटून घ्यायची असले बिन कामाचा उद्योग बंद करा.
ठोसेघर येथील माने वस्तीमध्ये आज रात्री ९ वाजण्याच्या सुमारास जंगली श्वापदाने एका श्वानावर जोरदार हल्ला चढवल्यामुळे त्यात ते श्वान जखमी झाले. गेल्या काही महिन्यांपासून ठोसेघर परिसरात एका वाघाचा वावर असल्याच्या जोरदार चर्चा घडत आहेत. त्यामुळे हा हल्ला वाघानेच केला असल्याची शक्यता व्यक्त होत असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
येथील सदरबझार परिसरात असणाऱ्या लक्ष्मी टेकडी परिसरात बीव्हीजी बिल्डिंगच्या आडोशाला जुगार घेताना सहा जण आढळून आले.
यशवंतनगर, ता. कराड येथील सह्याद्री साखर कारखान्याच्या इमारतीवरून पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
वडूज ते कोरेगाव एस.टी.मधुन प्रवास करीत असताना एका महिलेच्या पर्समधून दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे गंठण चोरून नेल्याची तक्रार कोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
येथील वाढे फाटा परिसरात अपघातात जखमी झालेल्या एकाचा खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
जिल्ह्यातील सर्व आले उत्पादक शेतकऱ्यांची होत असलेली लूट तात्काळ थांबवण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेळके यांनी सातारा, कोरेगाव, खटाव येथील शेती उत्पन्न बाजार समितीकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या कास पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम यावर्षी तब्बल दहा दिवस उशिरानं सुरू होत आहे. कास पठारावरील नैसर्गिक रंगीबेरंगी रानफुलांचा आनंद लुटण्यासाठी पठार पर्यटकांना यावर्षी खुलं करण्यात येणार असून 9 सप्टेंबरपासून ऑनलाईन बुकिंग सुरू होणार असल्याचा निर्णय वनसमितीच्या बैठकीत घेण्यात आला.
सायंकाळी मुसळधार पावसाने सातारा शहर परिसराला झोडपून काढल्यामुळे तब्बल तासभर जनजीवन ठप्प झाले होते. धो धो पाऊस पडल्यामुळे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची चांगलीच पळापळ झाली. दुसरीकडे रस्त्यावर बसलेल्या साहित्य विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचे फार मोठे नुकसान झाले.