फळांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स, ॲण्टीऑक्सिडंट्स आणि पोषणमुल्ये असतात. त्यामुळे दररोज एक तरी फळ खायलाच पाहिजे, असं आहारतज्ज्ञ सांगतात. त्यानुसार काही जण नियमित फळं खातातही. पण त्याचा पुरेसा लाभ शरीराला मिळत नाहीये असं काही जणांचं म्हणणं असतं. आयुर्वेदातही असं सांगितलेलं आहे की आपण जे काही खातो, ते आपल्या अंगी तेव्हाच लागतं, जेव्हा आपण खाण्यापिण्याचे काही नियम पाळतो (Food items that should be eaten together). कोणत्या पदार्थासोबत काय खावं आणि काय टाळावं, याचेही काही नियम आहेत. असेच काही नियम फळांच्या बाबतीतही आहेतम्हणूनच या लेखामध्ये आपण कोणते फळ किंवा भाजी कशासोबत खावी, जेणेकरून त्या पदार्थाचे पुरेपूर लाभ आपल्या शरीराला मिळतील, याविषयी जाणून घेणार आहोत. ही सर्व माहिती इन्स्टाग्रामच्या healthylyfff या पेजवर शेअर करण्यात आली आहे. यात सांगितलेल्या खाद्यपदार्थांच्या जोड्या एकमेकांसाठी पुरक असून त्यांचं कॉम्बिनेशन शरीरासाठी अतिशय पोषक असतं, असं यात सांगण्यात आलं आहे.
धोम कॉलनी येथे बंगल्याचे रंगकाम करत असताना शिडीवरून पाय घसरून पडल्याने प्रकाश नारायण दुर्गावळे (रा कुसगाव) यांचा मृत्यू झाला.
अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा शहर परिसरात तीन लाखांच्या जबरी चोरी प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा शहरासह जिल्ह्यातील पाचजण बेपत्ता झाल्याच्या घटना संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.
यंदा कोरोनाचे संकट मावळल्याने गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांनी गावी जाण्यासाठी एसटीला गर्दी केली होती. या परिवहन विभागानेही प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बसचे योग्यरीत्या संचलन केले होते. त्यामुळे सातारा एसटी विभागाच्या तिजोरीत यंदा गणेशोत्सवाच्या काळात ११ कोटी २९ लाख ८० हजारांची भर पडली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारमुळे देशात आमूलाग्र बदल होवून अर्थव्यवस्था मजबूत होत आहे. सर्वच पातळ्यांवर देशाची प्रगती होत आहे. भाजपमध्ये घराणेशाहीला थारा नाही. मात्र कॉंग्रेससह राज्यातील राष्ट्रवादीच्या बारामती आणि फलटणकरांची घराणेशाही मात्र एकदम ओक्केच असल्याचा टोला भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांनी लगावला.
राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात परखंदी (ता वाई) हायस्कूलचा विद्यार्थी यश ज्ञानेश्वर शिंदे व मार्गदर्शक विज्ञान शिक्षक तथा मुख्याध्यापक प्रसाद यादव यांनी तयार केलेल्या मल्टीपर्पज केटरिंग मशीन या उपकरणाला राष्ट्रीय सुवर्णपदक मिळाले आहे. या प्रदर्शनात महाराष्ट्राचा प्रथमच गौरव झाला आहे
ग्राहकाच्या ठेव पावत्यांचा अपहार केल्याप्रकरणी डीसीबी बँकेने ग्राहकास दंडासह नुकसानभरपाई देण्याचे जिल्हा ग्राहक आयोगाने आदेश दिले आहेत.
बावडा, ता. खंडाळा या गावचे सुपूत्र तथा ध्येयनिष्ठ शास्त्रज्ञ, ऊस संशोधक आणि उत्तम प्राध्यापक असणार्या डॉ. सुरेश मारुती पवार यांना यंदाचा द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असो. तर्फे 2022 चा लाईफ टाईम ऍचिव्हमेंट पुरस्कार राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करुन त्यांना गौरविण्यात आले.