मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदाच्या वर्षी नवरात्रोत्सवदेखील मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. जय दुर्गा, आई भवानीचा जयघोष करत आदिशक्तीचा नऊ दिवस जागर केल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी भावपूर्ण वातावरणात जिल्हयात 2180, तर शहरात 35 सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांनी देवींना भावपूर्ण निरोप दिला. शहरात तब्बल 11 तास मिरवणूक रंगली होती.
विलासपूर, गोडोली येथील दारू अड्ड्यावर छापा मारून सातारा शहर पोलीस ठाण्यात संबंधितावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फलटण शहर परिसरातून दुचाकी चोरीस गेल्याची फिर्याद फलटण शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
ट्रान्सफॉर्मर मधील तांब्याची तार चोरून नेऊन त्यातील ऑइल सांडून नुकसान केल्याप्रकरणी औंध पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञातावर म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये अंतर्गत बदल्यांचे सत्र सुरू झाले असून मुख्य कार्यालयामध्ये सुमारे अडीचशे ते तीनशे सेवकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्या विभाग अंतर्गत करण्यात आल्या असून यामध्ये तोंड बघून बदल्या झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये वाढती अस्वस्थता आहे.
कॉरिडोरच्या कार्यक्षेत्रावरून माण तालुक्यामध्ये आणि उत्तर कोरेगाव तालुक्यामध्ये गटा-तटाचा राजकीय वादंग सुरू आहे. याचे साद-पडसाद आगामी सातारा जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये दिसून येणार आहेत.
लागवडी पासून पाऊस आणि ढगाळ वातावराणामुळे खटाव तालुक्यातील झेंडू उत्पादक शेतकरीवर्ग अडचणीत सापडला आहे. सुर्यप्रकाशाअभावी बागा फुलल्या नसल्याने उत्पन्नात मोठी घट होणार असल्याने उत्पादन खर्चही निघेल की नाही, या चिंतेने शेतकरीवर्ग ग्रासला असून बुधच्या काही भागात पाऊस व वार्यामुळे अनेक झेंडूचे फड झोपले असून झेंडू उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
साताऱ्यातील मोती चौकातील समाधान वॉचचे मालक व सातारा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे चेअरमन शरदराव शंकरराव चव्हाण उर्फ काका ( वय 94) यांचे सोमवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले.