शहरातील एका वस्तीला मध्यरात्री दीड वाजता अचानक आग लागल्याने 20 ते 25 घरे जळून खाक झाली. या आगीमुळे चार सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगीने आणखीनच रौद्र रूप धारण केल्याने एकच खळबळ उडाली. अचानक लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात असणारी छोटी घरे तसेच व्यावसायिकांची खोकी या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने मोठी हानी झाली आहे. या घटनेत तीन महिलांना दूखापत झाली आहे.
येथील बुधवार पेठेतील शिवाजी क्लॉथ मार्केट समोर एकाने डॉक्टर महिलेवर कोयत्याने वार केला. तुम्ही वीज कनेक्शन जोडू नका; नाहीतर तुम्हाला जिवंत ठेवत नाही, असे म्हणून संबंधिताने हे कृत्य केले. गुरूवारी सकाळी 11.45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची नोंद शहर पोलीस ठाण्यात झाली असून याप्रकरणी एकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
येथील कृष्णा पुलावर उसाने भरलेल्या बैलगाडीला अचानक आग लागली. ही बाब इतर वाहन चालकांनी बैलगाडी चालकाच्या निदर्शनास आणली. त्यानंतर त्याने तात्काळ बैलांना बैलगाडीपासून वेगळे केल्याने अनर्थ टळला. बुधवार 16 रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, या घटनेने काही काळ पुलावर वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी ती सुरळीत केली.
घोगाव, ता. कराड येथील श्री संतकृपा शिक्षण संस्था व मातोश्री सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अशोकराव भावके (वय 52) यांचे अपघाती निधन झाले. कराड-रत्नागिरी महामार्गावर घोगाव येथे मंगळवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
येथील बारा डबरी वसाहतीत कुऱ्हाड, कोयता व लोखंडी गजाने दोन कुटूंबात मारामारी झाली. यामध्ये तिघेजण जखमी झाले आहे. मंगळवारी १५ रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी चौघांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोटे, ता. कराड येथे रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने वीज मीटर नियंत्रित करून वीज चोरी केल्याची घटना उघडा झाली आहे. याप्रकारे गेल्या वर्षभरात तब्बल 2 लाख 40 हजार 305 युनिट इतकी वीज चोरी केली असून त्याची किंमत तबल 27 लाख 57 हजार 400 रुपये आहे. वीज वितरण कंपनीच्या भरारी पथकाने गोटे येथील पी.बी. पॉलीमर्सवर ही कारवाई केली.
मलकापूर नगरपालिकेचे सन २०२२-२३ या सालाचे अंदाजपत्रक विशेष सभेमध्ये एकमताने मंजुर करण्यात आले. या अंदाजपत्रकामध्ये कोणतीही कर वाढ न करता नाविण्यपुर्ण योजनांचा समावेश करण्यात आला आहे.
पाटण विधानसभा मतदार संघातील नागरीकांच्या अडीअडचणी जाग्यावरच सोडविण्यासाठी १४ फेब्रुवारी रोजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या जनता दरबारास नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
काजारवाडी ते गोटेवाडीला जोडणाऱ्या साकव पुलाच्या कामासाठी ४ वर्ष अविरतपणे पाठपुरावा सुरू होता. हे काम करण्याचे आपले कर्तव्य असल्याचे सांगत पृथ्वीराज बाबांनी कराड दक्षिणच्या डोंगरकपारीपर्यंत निधी पोहचवत विकास केला आहे. बाबांच्या माध्यमातून आत्तापर्यंत दक्षिणेत अनेक कामे केली असून यापुढेही आणखी कामे करू, असे मत इंद्रजित चव्हाण यांनी व्यक्त केले.
नगरपालिकेच्या प्लास्टिक विरोधी पथकाने शुक्रवारी ११ रोजी शहरातील दुकानांमध्ये ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापरणाऱ्या दुकानदारांवर कारवाई केली. तसेच प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करण्याबाबत अन्य दुकानदारांना पालिकेच्या पथकाकडून सूचनाही करण्यात आल्या आहेत.