मसूर, ता.कराड येथे मंगळवार दि. १ रोजी मध्यरात्री दरोडेखोरांनी डॉक्टर दाम्प्त्यास मारहाण करत दागिन्यांसह रोकड लंपास केली. जखमी डॉक्टर दाम्प्त्यावर कराडमधील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संपत वारे व अनिता वारे अशी त्यांची नावे आहेत.
कराड तालुक्यातील तळबीड बेलवडे हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर कराड ते सातारा लेन वर आज सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास चारचाकी गाडीचा अपघात झाला. यामध्ये दोनजण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
येथील नगरपालिकेत माहिती अधिकारामध्ये एकाने माहिती मागवली होती. ती संबंधित अधिकाऱ्याने अर्जदारास दिली. मात्र, माहिती अशीच का दिली? असे म्हणत एकाने पालिका अधिकाऱ्यांसोबत वाद घालत त्याला पालिकेच्या आवारात मारहाण केली. त्यामुळे संतप्त पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संबंधितावर गुन्हा दाखल करण्यासाठी शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला.
कराड तालुक्यातील एका गावात 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली होती. याप्रकरणी न्यायालयाने 54 वर्षीय आरोपीला 20 वर्ष सक्तमजुरी आणि 22 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. कराड न्यायालयात जिल्हा व विशेष न्या. के. एस. होरे यांनी गुरूवारी ही शिक्षा सुनावली.
शिवसेनेचे सातारा उपजिल्हाप्रमुख व कराडचे नगरपालिकेचे माजी नगरसेवक रामभाऊ रैनाक (वय 62) यांचे सोमवारी २२ रोजी रात्री उशिरा ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने कराड शहरासह जिल्ह्यातून हळहळ व्यक्त होत आहे.
शिवप्रेम केवळ एकदोन दिवसांपुरते न दाखवता शिवरायांचे आचार, विचार आणि त्यांनी अनेकविध प्रसंगांमधून दिलेले लाखमोलाचे संदेश नित्य जोपासणाऱ्या निसर्गसेवक मावळ्यांनी आगशिवगडावर हरित व निसर्गवर्धक शिवजयंती साजरी केली.
येथील न्यायालय व बापूजी साळुंखे पुतळा परिसरातील देहविक्री करणाऱ्या महिलांच्या वस्तीला शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली होती. या आगीत १४ घरे जळून खाक झाली होती. या जळीत घरांचे महसुल विभागाच्या वतीने पंचनामे करण्यात आले. यामध्ये यात 14 घरांतील संसारोपयोगी साहीत्य, कपडे, रोख रक्कम व दागिने असे एकुण साडे चौदा लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.
कराड शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कोरोनाच्या निर्बंधांमुळे गेली दोन वर्षे शिवप्रेमी, दुर्गप्रेमी, नागरिकांना शिवजयंती उत्सव साजरा करता आला नव्हता. परंतु, यावर्षी कोरोना संसर्ग कमी झाल्याने शासनाने काही प्रमाणात निर्बंध शिथिल केल्याने लोकांमध्ये शिवजयंतीचा उत्साह दिसून आला.
थोर स्वातंत्र्य सेनानी दादासाहेब उंडाळकर यांच्या नावाने स्वर्गीय विलासकाकांनी सुरू केलेले उंडाळेचे व्यासपीठ राष्ट्रीय विचाराचे व्यासपीठ असून या व्यासपीठावरून समाज बांधणीचे महत्त्वपूर्ण काम झाले असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
किल्ले सुंदरगडावर (दात्तेगड) शिवजन्मोत्सवासह शिवयात्रा उत्साहात साजरी करण्यात आली. पारंपारिक वेशभूषातील शिवकन्या यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेचे पुजन करुन हारफुलांनी सजविलेल्या पाळण्यात शिवप्रतिमा ठेवून छत्रपतींचा सामुहिक पाळणा म्हटला. यावेळी शिवमावळ्यांनी शिवगर्जनेच्या घोषणा देऊन गडावर शिवकालीन वातावरण तयार केले.