नगराध्यक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणे म्हणजेच ‘सौ चुहे खाकर..बिल्ली हज को चली,’ अशी अवस्था ‘त्या’ बारा नगरसेवकांची झाली असून, त्यांनी स्वतः प्रथम आत्मपरीक्षण करावे नंतर नगराध्यक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप करावे, असा प्रतिटोला नगरसेवक कुमार शिंदे ऑनलाइन सभेस विरोध केलेल्या ‘त्या’ बारा नगरसेवकांना लगावला आहे.
महाबळेश्वर तालुक्यात कोरोना महामारीने थैमान घातले असून, अजूनही लोकांना कोरोनाची भीती व गांभीर्य नसल्या कारणामुळे काहीजण मास्क व सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत. अशा लोकांवर पाचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर व पाचगणीचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश पवार व सहकार्यांनी अचानकपणे पाचगणी बाजारपेठ, बसस्थानक, शॉपिंग सेंटर परिसरात मोहीम राबवून जनतेमध्ये मास्क न वापरणे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, गाडीत एकापेक्षा जास्त व्यक्ती असताना मास्क न वापरणे, दुकानात ग्राहकांनी एकमेकांमध्ये 6 फुटांपेक्
माण तालुक्यामध्ये नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे पिके जमीनदोस्त झाली असून, तालुक्याच्या पूर्व भागात या पावसामुळे नदी व ओढे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. तसेच या पावसाने नदीकाठच्या परिसरामध्ये बाजरी व ज्वारीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, संबंधित पिकांची पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकर्यांमधून होत आहे.
जिल्ह्यात गुरुवारी 790 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला तर 31 जणांचा उपचादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत 28,152 कोरोनाबाधित झाले आहेत. त्यापैकी 17,777 जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.
जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 913 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर 27 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच दिवसभरात 583 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढू लागला असताना कोरोनावर मात करूनही अनेकजण घरी परतत आहेत. आतापर्यंत एकूण 17,107 जणांनी कोरोनावर विजय मिळवला आहे.
‘मागील अनेक वर्षांपासून बरीचशी शिक्षक पदे संचमान्यतेत नव्हती. अनेक शिक्षक संघटना, विषय संघटना यांच्या मागण्यांचा आघाडी सरकारने विचार करून संचमान्यतेत नसलेली शिक्षक पदे पुन्हा घेण्याबाबत संचमान्यतेच्या निकषात बदल करण्याचा निर्णय घेतला. संचमान्यतेच्या निकषात काही त्रुटी असतील तर त्या संदर्भात विचार करून सर्व समावेशक निर्णय लवकरच जाहीर करू. तसेच शारीरिक शिक्षण शिक्षक पदाबाबत संघटनेच्या मागणीचा शासन सकारात्मक विचार करेल,’ असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री वषार्र् गायकवाड यांनी दिले.
पुसेगावसह परिसरात दररोज विजेच्या कडकडाटासह धो -धो पाऊस कोसळत असून, आठवडाभरात येथे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आहे. सतत पडणार्या या मुसळधार पावसाने जमीन वाफशावर येत नसल्याने खरिपातील सोयाबीन, घेवडा ही पिके पिवळी पडत आहेत. त्यामुळे बळीराजाच्या हाताशी आलेला खरीप हंगाम धोक्यात आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
कोरोनाच्या नियंत्रणासाठी तसेच मृत्यूदर कमी करण्यासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेची अंमलबजावणी पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महाबळेश्वर बाजारपेठेतील व्यापारी कुटुंबाची वैद्यकीय तपासणी करून करण्यात आली. या वेळी नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकार्यांनी केले.
पाचगणी नगरपालिका हद्दीतील सर्व स्टॉल धारकांचे लॉकडाऊन काळातील पाच महिन्यांचे भाडे माफ करावे, अशी मागणी पाचगणी श्रमजीवी स्टॉल युनियनच्यावतीने पालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर व नगराध्यक्षा लक्ष्मी कर्हाडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
खटाव तालुक्याची जीवनवाहिनी येरळा (वेदावती) नदीवरील ब्रिटिशकालीन नेर तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून, तलावाच्या सांडव्याच्या भिंतीला रानवेली व झुडपांनी वेढले आहे. त्यामुळे भिंतीला धोका पोहोचण्याची शक्यता असून, संबंधित विभागाने रानवेली व झुडपे छाटावीत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.