सातारा : आज संपूर्ण जग करोनाच्या विळख्यात सापडले आहे. सातारामध्येही कोरोना कहर वाढला आहे. अशाप्रसंगी कोरोनाग्रस्त पेशंटला हॉस्पिटलमध्ये जागा उपलब्ध होत नाही. सातारकरांची गरज ओळखून सातारकरांच्या सेवेकरिता हॉटेल रधिका पॅलेसमध्ये पाटील हॉस्पिटल प्रा. लि. कोरेगाव यांच्या सहकार्याने कोरोना केअर सेंटर सुरू केले आहे. ज्या पेशंट्सची ऑक्सिजन लेवल 94 पेक्षा जास्त आहे व वय दहा ते साठ ...
जिल्ह्यात बाधितांचे आकडे वाढण्याबरोबरच मृत्यूचे प्रमाणही वाढू लागले आहे. दररोज सुमारे 25 ते 35 रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे होत असल्यामुळे सातारा जिल्हावासीयांच्या काळजीत भर पडली आहे. मंगळवारीदेखील 35 रुग्णांचा उपचाराम्यान मृत्यू झाला तर 973 जण बाधित झाले.
‘कोरोनाची भीती सर्वांनाच लागलेली आहे. साथीच्या रोगांवर आपण जसे घरगुती उपाय किंवा दवाखान्यातून एखादे इंजेक्शन घेऊन त्यावर उपाय करतो, त्याचप्रमाणे कोरोनाचे नियम पाळून, आपण कोरोनावर मात करू शकतो. त्यामुळे कोरोनाबाबत असणारी मनातील भीती काढून, आपल्या कुटुंबीयांची कोरोना चाचणी करून घ्यावी. कोरोना व्हायरसशी लढत-लढत आपण जगायला शिका,’ असे प्रतिपादन विधान परीषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या शासनाच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेंतर्गत आरोग्यसंपन्न महाराष्ट्र घडवण्यामध्ये हातभार लावण्यासाठी सातारा जिल्हा प्रशासनानेही आरोग्यसंपन्न सातारा जिल्हा घडवण्याचा संकल्प केलेला असल्याचे चित्र दिसून येत आहे.
‘फलटण शहर व तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या सुमारे 2 हजारपर्यंत पोहोचली असून, त्यापैकी 700 रुग्ण फलटण शहरात आहेत. आतापर्यंत 30 ते 40 दिवसांनी दुप्पट होणारी रुग्णसंख्या आता 15 दिवसांत दुप्पट होत असून, त्यामध्ये वृद्धांची संख्या अधिक आहे. सप्टेंबरअखेर शहर व तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या 4 हजारपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे,’ अशी माहिती मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी दिली.
मराठा समाजाला दिलेले आरक्षण राज्य सरकारने कायम ठेवून त्याचा अध्यादेश काढावा.तसेच सुप्रीम कोर्टात पुनर्याचिका दाखल करण्यात यावी, यासाठी मराठा क्रांती मोर्चा फलटणच्यावतीने तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
माण तालुक्यातील येळेवाडी गावातील दडसवस्ती येथे असणार्या ओढ्यावर लोंबकळलेल्या वीज तारा नागरिकांसाठी व जनावरांसाठी धोकादायक असतानासुद्धा तेथून प्रवास करावा लागत असल्यामुळे नागरिक महावितरणच्या विरोधात प्रचंड नाराजी व्यक्त करत आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसागणिक वाढतच असून, सोमवारी दिवसभरात 31 रुग्णांचा मृत्यू झाला तर 898 जण कोरोनाबाधित झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 25,476 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
जिल्ह्यात रविवारी दिवसभरात तब्बल 35 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर 629 जण कोरोनाबाधित झाले आहेत. उग्र स्वरूप धारण केलेल्या या महामारीमुळे मृत्यूचे तांडव सुरू होण्यापूर्वी प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याबरोबरच नागरिकांनीही सतर्कता बाळणे गरजेचे आहे.
कोरोना संकटाच्या काळात पाल्याचे शिक्षण चांगल्या प्रकारे सुरु राहण्यासाठी शिक्षकांबरोबर पालकांची भूमिका तितकीच महत्त्वाची आहे. काही पालक शिक्षकांच्या मदतीने पाल्याच्या शिक्षणासाठी प्रयत्नशील आहेत. असेच लोधवडे ता. माण जि. सातारा येथील एका गरीब कुटुंबातील दिव्यांग शिवाजी काशिद आजोबा नातवाच्या शिक्षणासाठी धडपडत आहेत.