भारत सरकार सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय विकलांग व्यक्ती विभागाकडून दिव्यांग व्यक्तींकरिता महत्वाच्या सहा शिष्यवृत्ती योजना कार्यान्वित केल्या आहेत. या केंद्रीय शिष्यवृत्तीसाठी इ. 9 वी ते महाविद्यालयीन विभागात शिक्षण घेणारे दिव्यांग विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असून संबंधित संस्थांनी दि. 15 डिसेंबर पर्यंत अर्ज पडताळणी करणे आवश्यक आहे.
छत्रपती शिवराय यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे जावळी तालुका होय. या जावली तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मेढा नगरीचे नगरसेवक जेष्ठ पत्रकार शशिकांत गुरव यांची निवड करण्यात आली. तर कुढाळचे कार्याध्यक्ष इम्तियाज मुजावर, उपाध्यक्ष कासचे सूर्यकांत पवार व आनेवाडीचे शहाजी गुजर, सचिव धनंजय गोरे यांची निवड करण्यात आली.
महाविद्यालयातील एकही पात्र विद्यार्थी मतदार नोंदणी पासून वंचित राहणार नाही यासाठी महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी विशेष शिबीरांचे आयोजन करावे. या शिबीरांमध्ये जास्तीत जास्त व्होटर हेल्पलाईन ॲपचा वापर करुन नव मतदारांची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.
मौजे पार्ले, ता. कराड येथील स्मशानभूमी सुशोभिकरण करण्याच्या कामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या जनसुविधा योजनेमधून ४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.
गुरुवार (दि.१८) रोजी सकाळी सव्वा अकराच्या दरम्यान माल ट्रक (क्रमांक एम. एच. १८ बी.जी. ०८१४ ) हा पाटसकडून बारामतीकडे भरधाव वेगाने निघाला होता. याचवेळी सोनवडी सुपे फाट्यावर दुचाकी गाडी क्रमांक ( एम. एच ४२ बी. सी. ८२३४ ) बारामतीच्या दिशेने निघाली होती. यावेळी माल ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले.
वर्धा येथील यशवंतराव दाते स्मृती संस्थेच्या वतीने ज्येष्ठ विचारवंत डॉ. भा. ल. भोळे व डॉ. यशवंत सुमंत यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर (सातारा), अतुल देऊळगावकर (लातूर) व डॉ. गजानन अपिने (पुणे ) यांची निवड करण्यात आली व जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ कार्यकर्ते दत्ता देसाई (पुणे) यांची घोषणा करण्यात येत आहे, अशी माहिती निवड समितीचे प्रमुख निमंत्रक ज्येष्ठ अभ्यासक किशोर बेडकिहाळ व दाते संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागीय एसटी कार्यालयासमोर एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. मात्र, हा संप सूरु असताना वाहक राजेंद्र बाबूराव पवार (वय ५३, रा. १७२, यादोगोपाळ पेठ, सातारा) हे कर्तव्यावर हजर झाले.
मनिषा अरुण धनवडे (वय ३१, रा. ९८, शुक्रवार पेठ, सरपंच मारुती मंदिराच्या समोर, सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मनिषा या दि. १६ रोजी राहत्या घरी जेवण बनवत असताना तिथे असिया मोईन शेख यांनी अनाधिकाराने प्रवेश केला आणि घर खाली करण्याची धमकी देवून, मनिषा यांच्या गालाखाली चापट मारली.
16 फेब्रुवारी 2019 रोजी नाईकनवरे याने एकाचे अपहरण करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. नाईकनवरे व त्याच्या साथीदारांवर चोरी, रॉबरी व मारामारीचे गुन्हे दाखल होते. तो आणि त्याच्या साथीदारांवर मोक्का अर्तगत कारवाई करण्यात आली होती. अत्यंत सराईत गुन्हेगार हा गेल्या दोन वर्षापासून फरार होता.
बुधवारी दुपारी १२.३० ते १ वाजण्याच्या सुमारास काही युवक कृष्णा नदीपात्रात मच्छीमारी करत होते. यावेळी त्यांना नदीपात्रालगत पोत्यात भरलेला सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. परिसरात त्यांची मोठी दुर्गंधी पसरल्याने त्यांच्या ही बाब प्रखार्षाने निदर्शनास आली.