आर्थिक कारणावरुन आर्किटेक्टसह अन्य दोघांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पंचायत समिती नामदेव पाटील यांच्यासह सुमारे दहा जणांवर कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत आर्किटेक्ट जितेंद्र पारसमल भंडारी रा. कोयना कॉलनी, शनिवार पेठ, कराड यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सातारा परिसरातून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण केल्याच्या तक्रारी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या आहेत.
नॅशनल क्रेडिट कार्ड डिपार्टमेंट म्हणून बोलत असल्याचे भासवून फसवणूक केल्याप्रकरणी तमन्ना शर्मा या परप्रांतीय महिलेवर सातारा शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी कायदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रद्द करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर देशातील शेतकरी वर्गामध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनीही आता आपले आंदोलन मागे घेण्याचे आवाहन करत कृषी कायदे रद्ध झाल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळाला असल्याचे मत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्यमंत्रालयाद्वारे घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2021 आणि कचरामुक्त शहरे सर्वेक्षणमध्ये जिल्ह्यातील कराड आणि पाचगणी या शहरांनी बाजी मारली आहे. या शहरांना स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत देशपातळीवर पुरस्कार जाहीर झाला.
केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घेतल्यानंतर आज साताऱ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष करत साखर वाटून आपला आनंद साजरा केला. येथील सेव्हन स्टार चौकात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जोरदार घोषणाबाजी केली.
मालखेड, ता. कराड येथे बुधवार दि. 17 रोजी कृष्णा नदीपात्रात एक पुरुष जातीचा मृतदेह पोत्यात भरलेल्या अवस्थेत आढळला होता. हा घातपाताचा प्रकार असून मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पोत्यात भरून पाण्यात टाकल्याचे निदर्शनास आले. परंतु, मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटू शकली नाही.
रांजणे हे माझ्या बरोबरच आहेत. त्यांच्या पत्नीही राष्ट्रवादीमध्ये आहेत. इच्छुक असणे हा काही गुन्हा नाही. मात्र, गैरसमजातून हा विषय पुढे गेला असला, तरी एक-दोन दिवसात हा विषय मार्गी लागेल, असा विश्वास आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल बोलताना व्यक्त केला.
मुख्यतः यापूर्वी कारखान्यास उत्तम ऊस विकास पुरस्कार, उच्च तांत्रिक क्षमता पुरस्कार, उत्तम आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार देवून नॅशनल फेडरेशन ऑफ को- ऑपरेटीव्ह शुगर फॅक्टरीज ने अनेकवेळा सह्याद्रि कारखान्याचा गौरव केलेला आहे. तर राज्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे यांनीही उत्तम आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार देवून कारखान्यास सन्मानित केले आहे.
कराड नगरपालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान 2022 व स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत सामाजिक संस्था व वैयक्तिक नागरिकांसाठी भव्य वृक्षसंवर्धन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा कालावधी दि. 15 नोव्हेंबर ते 5 मे 2022 पर्यंत असणार आहे.