मागील 2 आठवड्यांपासून लालपरीला ब्रेक लागला आहे. एसटीच्या शासकीय विलिनीकरणासाठी कर्मचारी कामबंद आंदोलनावर ठाम आहेत. आता संप मिटत नाही, म्हणून महामंडळाने हालचाली सुरु केल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटत नसल्याने आता एसटी महामंडळाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
महामार्ग निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. त्याची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी संसदेच्या अधिवेशनात केली होती. मात्र यावर पुढे काहीच कार्यवाही न झाल्याने या भ्रष्टाचाराची पाळेमुळे आणखी खोल होत गेली आहेत. या भूसंपादनात चक्क भूसंपादन अधिकाऱ्याकडून सेटलमेंटसाठी शेतकऱ्यांकडून ४ टक्के कमिशनची मागणी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे.
माण-खटाव तालुक्यात वाळूचोरी जोमात सुरु असून याबाबत अनेकवेळा माध्यमांनी प्रशासनाला जागे करुन कारवाई करण्यास भाग पाडले आहे. या वाळू माफियांना धैर्य देण्यात जो अग्रभागी होता, त्याच्यावरच काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाल्याने अधिकार्यांवर कौतुकाचा वर्षाव झाला. मात्र यातील काही अधिकार्यांचे मात्र शील ढासळत असल्याचे चित्र आहे.
पुणे-कोल्हापूर रेल्वे मार्गावरील कराड-चिपळूण हा रेल्वे मार्ग मंजूर झाला होता. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा हा महात्वाकांशी प्रकल्प होता. तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी कराडला या प्रकल्पाचे भुमिपुजनही केले. तसेच राज्य सरकारने यातील 50 टक्के खर्च उचलण्याचे मान्य केले. परंतु, भाजपने समृद्धी महामार्गासाठी कराड-चिपळूण रेल्वे प्रकल्प रद्द केला असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
बेताल वक्तव्य करुन देशाचा व देशासाठी बलिदान दिलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या बद्दल अविचारी, अनैतिक व अवमानकारक अपशब्द वक्तव्य करणाऱ्या कंगणा राणावत हिच्या विरुध्द देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशा आशयाचे निवेदन जिल्हा कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव व खटाव तालुका कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहनराव जाधव यांनी पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे यांना दिले.
एस. टी. महामंडळाचे राज्य शासनाने विलीनीकरण करावे, या मागणीसाठी एस. टी. कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपासले आहे. या संपाचा आज अकरावा दिवस आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय सुरुच असली तरी विविध गावांनी व संघटनांनी या संपास लेखी पाठींबा दिला आहे.
दि. १७ रोजी रात्री साडेसात वाजता एकूण सहा संशयितांनी त्यांच्या घराजवळ आरडाओरडा केला. यावेळी तक्रारदार यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी ओरडू नका, असे म्हटल्याच्या कारणातून चिडून जावून तक्रारदार, त्यांचे वडील, आई तसेच भांडणे सोडवायला आलेल्या परिसरातील नागरिकांनी मारहाण करत दमदाटी केली. संशयितांनी ही मारहाण लाकडी दांडके व दगडाने केली आहे.
ओएलक्सवर फ्लॅट भाड्याने देणे आहे, अशी जाहिरात करून फ्लॅट भाड्याने देण्याऐवजी आपल्याच बँकेच्या खात्यातून ६० हजार रुपये गेल्याने घरमालकाला मनस्ताप सहन करावा लागला. ही घटना साताऱ्यातील गोडोली येथे घडली असून, याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या सातारा जिल्ह्यातील वाई हत्याकांडात माफीची साक्षीदार झालेल्या ज्योती मांढरेने गुरुवार दि.१८ रोजी सातारा जिल्हा न्यायालयात महत्वाची साक्ष दिली आहे. संतोष पोळनेच माझ्यासमोर तीन खून केल्याची साक्ष ज्योती मांढरेने दिली असून आपले पोळ याच्यासोबत मंदिरात लग्न झाल्याचंही ज्योती मांढरेने सांगितले आहे.
सातारा तालुक्यातील शेरेवाडी येथे बांधलेला गोठा पाडण्यात आल्याने, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून देखील न्याय मिळत नसल्याने सचिन वामन स्वामी या युवकाने गुरुवार दि.१८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात स्वतःवर ज्वलनशील द्रवपदार्थ ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली.