maharashtra

जावलीच्या राजकारणात आता मी लक्ष घालणार

आमदार शशिकांत शिंदे यांची स्पष्टोक्ती

I will now focus on the politics of Jawali
राष्ट्रवादी कॉंग्रेस वाढावी यासाठी मी सातत्याने प्रयत्न करीत असतो. सातारा जिल्ह्यात देखील राष्ट्रवादीच्या मजबूतीसाठी माझे प्रयत्न सुरु असतात. त्यातून कोणाच्या भावना दुखवल्या जात असतील तर माझा नाईलाज आहे.

सातारा : राष्ट्रवादी कॉंग्रेस वाढावी यासाठी मी सातत्याने प्रयत्न करीत असतो. सातारा जिल्ह्यात देखील राष्ट्रवादीच्या मजबूतीसाठी माझे प्रयत्न सुरु असतात. त्यातून कोणाच्या भावना दुखवल्या जात असतील तर माझा नाईलाज आहे. यापुर्वी जावळीत मी लक्ष घातले नव्हते. परंतु आता जावळीत राष्ट्रवादीची ताकद वाढविण्याकरिता आता मी स्वतः लक्ष घालणार असल्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनी नमूद केले. दरम्यान भाजप आमदार शिवेंद्रसिंहाराजे भोसले यांनी माझ्यासाठी प्रयत्न केल्याचे शिंदेंनी नमूद केले.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी आज (रविवार) विविध तालुक्यांत मतदानाची प्रक्रिया सुरु आहे. जावळीत आमदार शिंदे गट व प्रतिस्पर्धी रांजणे गट यांच्यात तणाव झाला. दोन्ही गटातील नेते, पोलिसांच्या आवाहनानंतर तणाव निवळला.
यावेळी पत्रकारांशीशी बोलताना आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, प्रतिस्पर्धी उमेदवार ज्ञानदेव रांजणे हे तांत्रिकदृष्टया राष्ट्रवादीत आहेत. अन्य सर्व लोकांना ते माहित आहे. मतदान प्रक्रियेच्या काळात फार मोठा राडा झाला नाही. केवळ बाचाबाची झाली. नंतर ती आम्ही मिटवली.

जावळीत लक्ष घालणार
मी अजून पर्यंत जावळीत लक्ष घातले नव्हते. आता या पुढे लक्ष घालीन असे एका प्रश्नास उत्तर देताना आमदार शिंदेंनी स्पष्ट केले. जावळीतील जनता १०० टक्के माझ्या पाठीशी आहे. काही स्वार्थी आहेत. ते गेले. आम्ही पुन्हा येथे राष्ट्रवादीची ताकद उभी करु. माझे भाग्य आहे जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच जिल्हाभरातील सर्व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माझ्या विजयासाठी प्रयत्न केले आहेत असे शिंदेंनी नमूद केले.
सर्वांनी सांगून सुद्धा ज्येष्ठांचे ऐकले गेले नाही. योग्य वेळी खूलासा केला जाईल. मी पक्षाचा एकनिष्ठ आहे. प्रयत्न करत माझ्या पक्षासाठी मी लढत राहतो. सामान्य जनता आणि कार्यकर्त्यांची नाळ माझ्याशी जोडली गेली आहे. भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी तुमच्यासाठी प्रयत्न केला. त्यांना मानणा-या कार्यकर्त्यांनी त्यांचे का ऐकले नाही याचा उलगडा होत नाही. त्यांनी प्रयत्न केला ही वस्तुस्थिती आहे. प्रयत्न केल्याने लोक मानत नसतील तर उद्याचा संघर्ष हा त्या लोकांबरोबर असेल, असे आमदार शशिकांत शिंदे यांनी नमूद केले.